धरणांत अपुरा पाणीसाठामुंबई : मुंबईवरील पाणीसंकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने पुढील ३०४ दिवस मुंबईला पाणी कसे पुरवायचे, हा गंभीर प्रश्न सध्या पालिकेला भेडसावत आहे. त्यामुळे सध्याची २० टक्के पाणीकपात वाढण्याची आणि पुढील पावसाळ्यापर्यंत कायम राहण्याची भीती आहे. येत्या १५ दिवसांमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता पुढील आठ महिने मुंबईकरांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून १ आॅक्टोबर रोजी सात तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लिटर्स पाणी असणे गरजेचे असते. पण आजघडीला ते केवळ ११ लाख ४५ हजार ००१ दशलक्ष लिटर्स एवढे आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा व भातसा या तलावांत अनुक्रमे २५९, २२७ दिवसांचाच पाणीसाठा आहे. हे पाणी तब्बल ३०४ दिवस पुरवायचे आहे. तलावआजची पातळीखोलीमोडक सागर१६२.८०१६३.१५तानसा१२८.१७१२८.६३विहार७७.२२८०.१२तुळशी१३९.०९१३९.१७अ. वैतरणा ६००.५९६०३.५१भातसा१३५.०८१४२.०७म. वैतरणा २८४.४३२८५(आकडेवारी मीटरमध्ये)
मुंबईवर पाणीकपातीचे वर्षभर संकट?
By admin | Updated: October 2, 2015 04:15 IST