शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निवडणुकांसाठी अधिवेशनावर पाणी

By admin | Updated: March 11, 2017 00:55 IST

जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापतींच्या निवडीची राजकीय खलबते करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तीन दिवसांचे कामकाज

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापतींच्या निवडीची राजकीय खलबते करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तीन दिवसांचे कामकाज रद्द करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज समितीने हा निर्णय घेतला आहे. १४ मार्च रोजी २५ जिल्ह्यांतील पंचायत समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत. ११ व १२ मार्च शनिवार, रविवारची सुटी तर १३ मार्च मंगळवारी धुलिवंदनाची सुटी आली आहे. त्याला जोडून आता १४ मार्च रोजी पंचायत समितच्या सभापतीपदांची मोट बांधता यावी म्हणून अधिवेशनाला सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात १५ ते १८ असे चारच दिवस कामकाज होणार आहे.२१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. १९ मार्चला अधिवेशनाला रविवारची सुटी आहे. मात्र सोमवारी २० मार्च रोजी फक्त एक दिवसासाठी अधिवेशनाला यायचे आणि पुन्हा २१ मार्चला मंगळवारी निवडणुकीसाठी परत जायचे यापेक्षा २० आणि २१ मार्च दोन्ही दिवस अधिवेशनच नको असा सूर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लावला. परिणामी तिसऱ्या आठवड्यात २२ ते २४ असे तीनच दिवस कामकाज होईल. अधिवेशनाचा पहिल्या आठवड्यात भाजपा पुरस्कृत आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरुन आणि कर्जमाफीच्या मागणीवरुन दोन्ही सभागृह चालले नाहीत. विधानसभेत फक्त एकच दिवस कामकाज झाले. २८ मार्च रोजी मंगळवारी गुडीपाडव्याची सुट्टी आहे. मग सोमवारी २७ मार्च रोजी एकच दिवस कशाला अधिवेशन करायचे म्हणून त्यादिवशी सुटी दिली गेली आहे. अधिवेशनाच्या पाचव्या आठवड्यात मंगळवारी ४ एप्रिल रोजी रामनवमीची सुटी आल्याने सोमवारी ३ एप्रिल रोजी अधिवेशनाला सुटी देण्यात आली आहे. यावर बोलताना, विरोधकांकडेच विषय नसल्यामुळे आणि बोलण्यासारखे काहीच शिल्लक नाही म्हणून अधिवेशनात गोंधळ घालण्याचे काम ते करत आहेत, असा आरोप संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी केला आहे.