शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

टाटा धरणांतील पाण्यासाठी जलसत्याग्रह

By admin | Updated: May 8, 2016 02:13 IST

टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील

लोणावळा : टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील नागरिकांनी वलवण धरणाच्या जलाशयात उतरून जलसत्याग्रह केला. यावेळी पत्रकारांना टाटा धरणापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आंदोलकांपैकी केवळ १० जणांना धरणावर जल सत्याग्रहासाठी सोडले. तेदेखील त्यांच्याकडील मोबाइल व कॅमेरे काढून घेण्यात आले होते. धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे, याची माहिती सर्वांना मिळू नये याकरिता ही दक्षता घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. टाटाचे मावळ व मुळशी परिसरातील वलवण, लोणावळा, शिरवता, सोमवडी, ठोकळवाडी व मुळशी या सहा धरणांमध्ये तब्बल ४८.९७ टी.एम.सी. एवढा पाणासाठा शिल्लक ठेवला आहे. हे पाणी भीमा खोऱ्यात वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांचे अडविलेले आहे. ते आमच्या हक्काचे असून, तातडीने दुष्काळग्रस्त नागरिकांना द्यावे. तसेच इंद्रायणी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. टाटाचा हा जलव्यवहार राज्यघटनेच्या कलम ३८ व ३९च्या विरोधात, तसेच जलनीती, जलसंपत्ती प्राधिकरण कायदा व जलविद्युत कायद्याविरोधात असल्याचे सांगत आंदोलकांनी टाटाच्या अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिली. (वार्ताहर)