शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शिवकालीन पाणी साठवणुकीतून ‘जलसंधारण’

By admin | Updated: October 1, 2014 01:30 IST

राज्यात विविध प्रकारच्या ८८११ जलसंधारणाची बांधकामे करण्यात आलीत.

संतोष वानखडे/वाशिम राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यात विविध प्रकारच्या ८८११ जलसंधारणाची बांधकामे करण्यात आली आहेत. जलपातळीतील घट उंचाविण्याबरोबरच जलपातळी समान ठेवणे, या दृष्टिकोनातून शासनाने विविध उपक्रम व योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचाच एक भाग असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत विविध उपयोजना राबविल्या जात आहेत. साधारणत: पावसाळा सुरू होण्यापूर्वी पारंपारिक व अपारंपारिक उपाययोजनांद्वारे पाण्याचे संधारण करणे, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, छतावरील पाण्याची साठवणूक, पावसाचे पाणी साठवण्यासाठी डोंगराळ भागात तलाव बांधणे आदी कामे हाती घेतली जातात. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा एक मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून राज्यातील ग्रामीण भागात पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी फेब्रुवारी २0१४ पर्यंत ८८११ बांधकामे करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन हजार ७३ बांधकामे औरंगाबाद विभागात, त्याखालोखाल नागपूर विभागात १८८३, अमरावती विभागात १७२0, कोकण ९६५, पूणे ९१३ आणि सर्वात कमी २५७ बांधकामे नाशिक विभागात करण्यात आल्याची नोंद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या दफ्तरी आहे. फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यातील १२ हजार १0४ वस्त्यांची निवड विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या उपाययोजनांसाठी करण्यात आली होती. या वस्त्यांमध्ये ३१ हजार ६१0 उपाययोजना निश्‍चित केल्या होत्या. त्यापैकी १0 हजार ४१0 वस्त्यांमधील २८ हजार १२ उपाययोजना पूर्णत्वाकडे गेल्या असून त्यावर ४२१ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.