शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय

By admin | Updated: April 26, 2017 01:49 IST

संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून

मुंबई : संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत त्यास मान्यता दिली. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेच्या परिसरात हे आयुक्तालय येत्या १ मे पासून सुरु होणार आहे.गेल्या आॅक्टोबर मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्याची कार्यवाही करण्यात आली. मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्त पदावर भारतीय प्रशासन सेवेतील (अधिकालिक वेतनश्रेणीत) अधिकारी नेमण्यात येणार आहे. जल व भू-व्यवस्थापन ( वाल्मी ) ही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील प्रशिक्षण संस्था तिच्या स्वायत्ततेला बाधा न आणता मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करुन या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सरळसेवा पदभरतीसाठी घालण्यात आलेली बंदी मृद व जलसंधारण विभागास लागू ठरणार नाही. तसेच, मृद व जलसंधारण विभागाचे स्वतंत्र सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध होईपर्यंत आकृतिबंधामध्ये मंजूर असलेल्या सर्व पदांसाठी जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कृषी इत्यादी विभागातील समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियम लागू ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)