शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जलसंकट ‘अस्मानी’ नव्हे, सुलतानी!

By admin | Updated: April 30, 2016 04:58 IST

राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे

नागपूर : राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे. पावसाने दगा दिला, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा सर्रास खोटारडेपणा आहे. राज्यातील जलसंकट हे ‘अस्मानी’ नव्हे ‘सुलतानी’ आहे. शासन आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आज ही स्थिती उद्भवली आहे, अशी टीका दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी येथे केली. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त २० जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात मराठवाड्यातील आठ, विदर्भातील सात व नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. देसरडा हे चार दिवसांपासून विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रविभवन येथे त्यांनी पत्रकारांना दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, मागील तीन वर्षांत पाऊस कमी पडला, हे खरे आहे. मात्र त्याने दगा दिला नाही. त्यामुळे पावसामुळे आजच्या पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. पाऊस कमी जास्त पडतच असतो. हा निसर्गचक्राचा एक भाग आहे. मागील वर्षी मराठवाड्यात ४० टक्के व विदर्भात केवळ २० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या दुष्काळाचे संपूर्ण खापर पावसाच्या डोक्यावर फोडणे पूर्णत: चुकीचे आहे. विदर्भ हा दुष्काळग्रस्त प्रदेश होऊच शकत नाही, येथील शेतात प्रत्येक पावसाळ््यात एक कोटी लीटर प्रति हेक्टर पाऊस पडतो. मग आजची परिस्थिती का निर्माण झाली, याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. ४ फेब्रुवारीपासून राज्यातील २० जिल्ह्यांतील गावांना भेटी देऊन, गावकरी, प्रशासन व तज्ज्ञांशी संवाद साधला आहे. त्यातून ही वस्तुस्थिती पुढे आल्याचे देसरडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)