शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकट ‘अस्मानी’ नव्हे, सुलतानी!

By admin | Updated: April 30, 2016 04:58 IST

राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे

नागपूर : राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे. पावसाने दगा दिला, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा सर्रास खोटारडेपणा आहे. राज्यातील जलसंकट हे ‘अस्मानी’ नव्हे ‘सुलतानी’ आहे. शासन आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आज ही स्थिती उद्भवली आहे, अशी टीका दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी येथे केली. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त २० जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात मराठवाड्यातील आठ, विदर्भातील सात व नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. देसरडा हे चार दिवसांपासून विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रविभवन येथे त्यांनी पत्रकारांना दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, मागील तीन वर्षांत पाऊस कमी पडला, हे खरे आहे. मात्र त्याने दगा दिला नाही. त्यामुळे पावसामुळे आजच्या पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. पाऊस कमी जास्त पडतच असतो. हा निसर्गचक्राचा एक भाग आहे. मागील वर्षी मराठवाड्यात ४० टक्के व विदर्भात केवळ २० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या दुष्काळाचे संपूर्ण खापर पावसाच्या डोक्यावर फोडणे पूर्णत: चुकीचे आहे. विदर्भ हा दुष्काळग्रस्त प्रदेश होऊच शकत नाही, येथील शेतात प्रत्येक पावसाळ््यात एक कोटी लीटर प्रति हेक्टर पाऊस पडतो. मग आजची परिस्थिती का निर्माण झाली, याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. ४ फेब्रुवारीपासून राज्यातील २० जिल्ह्यांतील गावांना भेटी देऊन, गावकरी, प्रशासन व तज्ज्ञांशी संवाद साधला आहे. त्यातून ही वस्तुस्थिती पुढे आल्याचे देसरडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)