शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

जलसंकट ‘अस्मानी’ नव्हे, सुलतानी!

By admin | Updated: April 30, 2016 04:58 IST

राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे

नागपूर : राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे. पावसाने दगा दिला, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा सर्रास खोटारडेपणा आहे. राज्यातील जलसंकट हे ‘अस्मानी’ नव्हे ‘सुलतानी’ आहे. शासन आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आज ही स्थिती उद्भवली आहे, अशी टीका दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी येथे केली. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त २० जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात मराठवाड्यातील आठ, विदर्भातील सात व नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. देसरडा हे चार दिवसांपासून विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रविभवन येथे त्यांनी पत्रकारांना दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, मागील तीन वर्षांत पाऊस कमी पडला, हे खरे आहे. मात्र त्याने दगा दिला नाही. त्यामुळे पावसामुळे आजच्या पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. पाऊस कमी जास्त पडतच असतो. हा निसर्गचक्राचा एक भाग आहे. मागील वर्षी मराठवाड्यात ४० टक्के व विदर्भात केवळ २० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या दुष्काळाचे संपूर्ण खापर पावसाच्या डोक्यावर फोडणे पूर्णत: चुकीचे आहे. विदर्भ हा दुष्काळग्रस्त प्रदेश होऊच शकत नाही, येथील शेतात प्रत्येक पावसाळ््यात एक कोटी लीटर प्रति हेक्टर पाऊस पडतो. मग आजची परिस्थिती का निर्माण झाली, याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. ४ फेब्रुवारीपासून राज्यातील २० जिल्ह्यांतील गावांना भेटी देऊन, गावकरी, प्रशासन व तज्ज्ञांशी संवाद साधला आहे. त्यातून ही वस्तुस्थिती पुढे आल्याचे देसरडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)