शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठवाड्यावर जलसंकट!

By admin | Updated: July 14, 2015 01:10 IST

मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची

औरंगाबाद : मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चार जिल्हे टँकरवर अवलंबून असून जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे.विभागातील सर्व प्रकल्पांत मिळून ५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागणार आहे. आठ जिल्ह्यांत सुमारे सव्वादोन कोटींहून अधिक लोकसंख्या आहे. त्यातील ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ६० टक्के लोकसंख्या प्रकल्पातील पाण्यावर, तर ४० टक्के लोकसंख्या विहिरी, हातपंप व टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मराठवाड्यातील मध्यम ७५, लघु ७२१, गोदावरीवरील बंधारे ११, मांजरा नदीवरील बंधारे १६ अशा ८३४ प्रकल्पांत ७ हजार ९११.२७ द.ल.घ.मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. सद्य:स्थितीत विभागातील प्रकल्पांमध्ये ३४५ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून, हे प्रमाण ५ टक्के इतके आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिकांमध्येपाणी कपात करावी लागेल,असे विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उद्योगांची पाणीकपात-जायकवाडी जलाशयात ७.५८ द.ल.घ.मी (०.३४ टक्के) इतका अत्यल्प पाणीसाठा असल्याने औरंगाबाद शहर व अहमदनगरजवळच्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सोमवारी झाला.जिल्हापेरणी क्षेत्रप्रत्यक्ष पेरणीटक्केवारीहेक्टरहेक्टरऔरंगाबाद६२९९ ६०३० ९५ जालना५६१४४८२६८५बीड६१९८४९२१७९लातूर५५६८३२५२५८उस्मानाबाद३९२४१८९९४८नांदेड७५४६६७३०८९परभणी५३८५२६४५४९हिंगोली३४०३२२३३६६एकूण४३९४०३२५३८७५