शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

महापालिका अधिकाऱ्यांचे ठाण्यात पाणीबचतीचे धडे

By admin | Updated: May 21, 2016 03:45 IST

ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत.

अजित मांडके,

ठाणे- ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे ठाण्यात आठवड्यातून दोन दिवस आणि कळवा, मुंब्रा, दिव्यात तीन दिवसांचे पाण्याचे शटडाऊन घेतले जात आहे. महापालिकेने ठाणेकरांना पाणीबचतीचे आवाहनदेखील केले आहे. हा संदेश देतानाच त्यांनी स्वत:पासूनही पाणीबचतीस सुरुवात केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडे ठाणेकर नागरिक भेटण्यास गेल्यास त्याला विचारल्याशिवाय पाणी दिले जात नाही. तसेच ते देताना अर्धा ग्लासच दिले जात आहे. शिवाय, ज्याज्या ठिकाणी नळांद्वारे पाणीगळती सुरू होती, त्या ठिकाणीच ती बंद करण्याचे कामही सुरू झाले आहे. ठाणे शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सध्या ते मुबलक असले तरीदेखील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरवण्यासाठी महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. तसेच हॉटेल, उद्योग, मॉल आदी ठिकाणी वापरणाऱ्या पाण्यावर अंकुश ठेवण्यासाठी या सर्वांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे. परंतु, ठाणेकरांना पाणीबचतीची सवय व्हावी, या उद्देशाने पालिकेनेच या मोहिमेची सुरुवात आपल्यापासून केली आहे. महापालिकेच्या माहिती जनसंपर्क विभागात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा विचारूनच पाणी दिले जात असून तेही अर्धा ग्लासच दिले जात आहे. पाण्याची बचत करण्याचे आवाहन ठाणेकरांना करण्याबरोबरच त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केली असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी लोकमतला दिली. नळातून वाहत जाणाऱ्या पाण्यावरदेखील अंकुश बसवण्यासाठी गळक्या नळांची दुरुस्ती करण्याचे कामही केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या घरच्यांनादेखील जेवढे पाणी आवश्यक असेल, तेवढेच वापरण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विभागांनादेखील आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाणीबचत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक विभागात आता अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. यातूनच पालिकेने जलमित्र होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तसेच लोकमतने सुरू केलेल्या जलमित्र या मोहिमेचेही कौतुक केले आहे.