शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महापालिका अधिकाऱ्यांचे ठाण्यात पाणीबचतीचे धडे

By admin | Updated: May 21, 2016 03:45 IST

ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत.

अजित मांडके,

ठाणे- ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे ठाण्यात आठवड्यातून दोन दिवस आणि कळवा, मुंब्रा, दिव्यात तीन दिवसांचे पाण्याचे शटडाऊन घेतले जात आहे. महापालिकेने ठाणेकरांना पाणीबचतीचे आवाहनदेखील केले आहे. हा संदेश देतानाच त्यांनी स्वत:पासूनही पाणीबचतीस सुरुवात केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडे ठाणेकर नागरिक भेटण्यास गेल्यास त्याला विचारल्याशिवाय पाणी दिले जात नाही. तसेच ते देताना अर्धा ग्लासच दिले जात आहे. शिवाय, ज्याज्या ठिकाणी नळांद्वारे पाणीगळती सुरू होती, त्या ठिकाणीच ती बंद करण्याचे कामही सुरू झाले आहे. ठाणे शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सध्या ते मुबलक असले तरीदेखील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरवण्यासाठी महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. तसेच हॉटेल, उद्योग, मॉल आदी ठिकाणी वापरणाऱ्या पाण्यावर अंकुश ठेवण्यासाठी या सर्वांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे. परंतु, ठाणेकरांना पाणीबचतीची सवय व्हावी, या उद्देशाने पालिकेनेच या मोहिमेची सुरुवात आपल्यापासून केली आहे. महापालिकेच्या माहिती जनसंपर्क विभागात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा विचारूनच पाणी दिले जात असून तेही अर्धा ग्लासच दिले जात आहे. पाण्याची बचत करण्याचे आवाहन ठाणेकरांना करण्याबरोबरच त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केली असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी लोकमतला दिली. नळातून वाहत जाणाऱ्या पाण्यावरदेखील अंकुश बसवण्यासाठी गळक्या नळांची दुरुस्ती करण्याचे कामही केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या घरच्यांनादेखील जेवढे पाणी आवश्यक असेल, तेवढेच वापरण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विभागांनादेखील आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाणीबचत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक विभागात आता अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. यातूनच पालिकेने जलमित्र होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तसेच लोकमतने सुरू केलेल्या जलमित्र या मोहिमेचेही कौतुक केले आहे.