शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी

By admin | Updated: June 30, 2016 01:40 IST

शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे.

शिरूर : शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शहराला उद्यापासून (दि. ३०) तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेला घ्यावा लागला आहे.शहराला सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यात बंधाऱ्यात पाणीसाठा मर्यादित झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यानंतर नगर परिषदेने बंधाऱ्याच्या वरील भागातील इतर बंधाऱ्यातील पाणी खाली आणण्यासाठी १० ते १५ दिवस प्रयत्न केले. हे पाणी बंधाऱ्यात पोहोचण्यापूर्वी आहे तो पाणीसाठा कमी होत गेल्याने ३ एप्रिलपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. १७ एप्रिलला वरील बंधाऱ्यातील पाणी या बंधाऱ्यात आले. मात्र, हा साठाही मर्यादित असल्याने नगर परिषदेने शहराला दोन दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू ठेवला.यादरम्यान सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या मागणीनुसार ५ मे रोजी कालव्याद्वारे सोडलेले पाणी बंधाऱ्यात पोहोचले. यातून बंधारा अर्धाच भरला; मात्र यानंतर शहराला पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी उपसले गेल्याने हा साठाही कमी होऊ लागल्याने १६ जूनपासून पुन्हा २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आताची परिस्थिती याहून गंभीर झाल्याने नगरपरिषदेला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पाणीटंचाईच्या या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पाणी वाया जाऊ नये यासाठी नळाला तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.पाऊस पडल्याशिवाय बंधाऱ्यात पाणीसाठा उपलब्ध होणार नसल्याने शहरावर पाणीसंकट कोसळले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांत पाऊस झाला नसून, धरणक्षेत्रातही पाऊस नाही. अशात पाऊस न झाल्यास शहराला मोठ्या पाणीसंकटाचा सामना करावा लागेल.