शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी

By admin | Updated: June 30, 2016 01:40 IST

शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे.

शिरूर : शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शहराला उद्यापासून (दि. ३०) तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेला घ्यावा लागला आहे.शहराला सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यात बंधाऱ्यात पाणीसाठा मर्यादित झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यानंतर नगर परिषदेने बंधाऱ्याच्या वरील भागातील इतर बंधाऱ्यातील पाणी खाली आणण्यासाठी १० ते १५ दिवस प्रयत्न केले. हे पाणी बंधाऱ्यात पोहोचण्यापूर्वी आहे तो पाणीसाठा कमी होत गेल्याने ३ एप्रिलपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. १७ एप्रिलला वरील बंधाऱ्यातील पाणी या बंधाऱ्यात आले. मात्र, हा साठाही मर्यादित असल्याने नगर परिषदेने शहराला दोन दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू ठेवला.यादरम्यान सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या मागणीनुसार ५ मे रोजी कालव्याद्वारे सोडलेले पाणी बंधाऱ्यात पोहोचले. यातून बंधारा अर्धाच भरला; मात्र यानंतर शहराला पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी उपसले गेल्याने हा साठाही कमी होऊ लागल्याने १६ जूनपासून पुन्हा २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आताची परिस्थिती याहून गंभीर झाल्याने नगरपरिषदेला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पाणीटंचाईच्या या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पाणी वाया जाऊ नये यासाठी नळाला तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.पाऊस पडल्याशिवाय बंधाऱ्यात पाणीसाठा उपलब्ध होणार नसल्याने शहरावर पाणीसंकट कोसळले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांत पाऊस झाला नसून, धरणक्षेत्रातही पाऊस नाही. अशात पाऊस न झाल्यास शहराला मोठ्या पाणीसंकटाचा सामना करावा लागेल.