शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या

By admin | Updated: April 4, 2017 03:19 IST

विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार

समीर कर्णुक,मुंबई- विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. इमारतींचा पूर्णपणे पुनर्विकास होईपर्यंत पाण्याचे बिल भरण्याचे आश्वासन विकासकाने रहिवाशांना दिले होते. मात्र साडेतीन कोटींवर हे बिल गेल्यानंतरदेखील थकबाकी जमा होत नसल्याने पालिकेने या सर्व रहिवाशांना नोटीस पाठविली आहे आणि पाण्याचे बिल भरले नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पालिकेने याबाबत काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.२००३ सालापासून चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात एका खासगी विकासकाकडून जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत यातील ८ ते १० इमारती तयार झाल्या आहेत. तर अद्यापही यातील अनेक इमारतींचे काम बाकी आहे. या ठिकाणी पुनर्विकास करणाऱ्या विकासकाने रहिवाशांसोबत करार करतेवेळी पालिकेचे पाणी बिल तसेच इतर कर विकासकच भरणार, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जुन्या आणि नवीन अशा एकूण ५८ इमारतींचे गेल्या अनेक वर्षांपासून विकासकाने पालिकेचे पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे सध्या हे बिल साडेतीन कोटींच्या घरात गेले आहे. पालिकेने अनेकदा बिल भरण्यासाठी नोटीस पाठवल्या. मात्र त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केले. परिणामी पालिकेने सर्व सोसायट्यांच्या नावे अखेरची नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये येत्या ५ ते ६ दिवसांत ही थकीत बिलाची रक्कम भरली नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी ही बाब स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ याबाबत पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ही कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. तसेच पालिकेला पत्र पाठवून संबंधित विकासकाकडून ही थकबाकी वसूल करत त्याच्यावर कडक करवाई करण्याची मागणी मराठे यांनी केली आहे.>विकासकाची चूक आहे. त्यामुळे पालिकेने ही रक्कम विकासकाकडून वसूल करावी. शिवाय पालिकेने अशा प्रकारे रहिवाशांवर तडकाफडकी कारवाई केल्यास आम्ही पालिकेविरोधात आंदोलन छेडू.- आशा मराठे, स्थानिक नगरसेविका