शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या

By admin | Updated: April 4, 2017 03:19 IST

विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार

समीर कर्णुक,मुंबई- विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. इमारतींचा पूर्णपणे पुनर्विकास होईपर्यंत पाण्याचे बिल भरण्याचे आश्वासन विकासकाने रहिवाशांना दिले होते. मात्र साडेतीन कोटींवर हे बिल गेल्यानंतरदेखील थकबाकी जमा होत नसल्याने पालिकेने या सर्व रहिवाशांना नोटीस पाठविली आहे आणि पाण्याचे बिल भरले नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पालिकेने याबाबत काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.२००३ सालापासून चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात एका खासगी विकासकाकडून जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत यातील ८ ते १० इमारती तयार झाल्या आहेत. तर अद्यापही यातील अनेक इमारतींचे काम बाकी आहे. या ठिकाणी पुनर्विकास करणाऱ्या विकासकाने रहिवाशांसोबत करार करतेवेळी पालिकेचे पाणी बिल तसेच इतर कर विकासकच भरणार, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जुन्या आणि नवीन अशा एकूण ५८ इमारतींचे गेल्या अनेक वर्षांपासून विकासकाने पालिकेचे पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे सध्या हे बिल साडेतीन कोटींच्या घरात गेले आहे. पालिकेने अनेकदा बिल भरण्यासाठी नोटीस पाठवल्या. मात्र त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केले. परिणामी पालिकेने सर्व सोसायट्यांच्या नावे अखेरची नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये येत्या ५ ते ६ दिवसांत ही थकीत बिलाची रक्कम भरली नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी ही बाब स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ याबाबत पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ही कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. तसेच पालिकेला पत्र पाठवून संबंधित विकासकाकडून ही थकबाकी वसूल करत त्याच्यावर कडक करवाई करण्याची मागणी मराठे यांनी केली आहे.>विकासकाची चूक आहे. त्यामुळे पालिकेने ही रक्कम विकासकाकडून वसूल करावी. शिवाय पालिकेने अशा प्रकारे रहिवाशांवर तडकाफडकी कारवाई केल्यास आम्ही पालिकेविरोधात आंदोलन छेडू.- आशा मराठे, स्थानिक नगरसेविका