शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या

By admin | Updated: April 4, 2017 03:19 IST

विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार

समीर कर्णुक,मुंबई- विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. इमारतींचा पूर्णपणे पुनर्विकास होईपर्यंत पाण्याचे बिल भरण्याचे आश्वासन विकासकाने रहिवाशांना दिले होते. मात्र साडेतीन कोटींवर हे बिल गेल्यानंतरदेखील थकबाकी जमा होत नसल्याने पालिकेने या सर्व रहिवाशांना नोटीस पाठविली आहे आणि पाण्याचे बिल भरले नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पालिकेने याबाबत काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.२००३ सालापासून चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात एका खासगी विकासकाकडून जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत यातील ८ ते १० इमारती तयार झाल्या आहेत. तर अद्यापही यातील अनेक इमारतींचे काम बाकी आहे. या ठिकाणी पुनर्विकास करणाऱ्या विकासकाने रहिवाशांसोबत करार करतेवेळी पालिकेचे पाणी बिल तसेच इतर कर विकासकच भरणार, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जुन्या आणि नवीन अशा एकूण ५८ इमारतींचे गेल्या अनेक वर्षांपासून विकासकाने पालिकेचे पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे सध्या हे बिल साडेतीन कोटींच्या घरात गेले आहे. पालिकेने अनेकदा बिल भरण्यासाठी नोटीस पाठवल्या. मात्र त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केले. परिणामी पालिकेने सर्व सोसायट्यांच्या नावे अखेरची नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये येत्या ५ ते ६ दिवसांत ही थकीत बिलाची रक्कम भरली नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी ही बाब स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ याबाबत पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ही कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. तसेच पालिकेला पत्र पाठवून संबंधित विकासकाकडून ही थकबाकी वसूल करत त्याच्यावर कडक करवाई करण्याची मागणी मराठे यांनी केली आहे.>विकासकाची चूक आहे. त्यामुळे पालिकेने ही रक्कम विकासकाकडून वसूल करावी. शिवाय पालिकेने अशा प्रकारे रहिवाशांवर तडकाफडकी कारवाई केल्यास आम्ही पालिकेविरोधात आंदोलन छेडू.- आशा मराठे, स्थानिक नगरसेविका