शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

‘जलयुक्त शिवार’च्या अटी जाचक !

By admin | Updated: September 12, 2015 01:57 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अटी जाचक असल्याची टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.

उस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अटी जाचक असल्याची टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. शिवसेनेची ‘शिवजल क्रांती’ योजना राज्यातील सर्व गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दुष्काळग्रस्त एक हजार शेतकऱ्यांना सेनेतर्फे शुक्रवारी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. या कार्यक्रमात सेनेच्या मंत्र्यांनी भाजपाकडून कौतुक केल्या जाणाऱ्या योजनांवर टीकास्त्र सोडण्यात आले. १० दिवसांपूर्वीच उस्मानाबादच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेची प्रशंसा केली होती. ‘जलयुक्त’ ही केवळ योजना राहिली नसून, लोकचळवळ झाल्याचे ते म्हणाले होते. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र सेनेने शुक्रवारी या योजनेवर टीकास्त्र सोडले. भाजपा सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेच्या अटी जाचक असल्याने अनेक गावांना त्यात सहभागी होता आलेले नाही. त्यामुळे शिवसेना ‘शिवजल क्रांती योजना’ राबविणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. प्रकल्पासाठी सेनेचे आमदार, खासदार निधी देतील, असेही त्यांनी सांगितले.कोकणात ‘केमिकल झोन’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच केली.त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यालाही सेनेचा कडाडून विरोध असल्याचे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी स्पष्ट केले. कोकणात कोणत्याही स्थितीत ‘केमिकल झोन’ होऊ देणार नसल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)हक्काच्या पाण्याबाबतही मतभेद-कृष्णा खोऱ्याच्या पहिल्या लवादाने मराठवाड्यासाठी मान्य केलेले ७ टीएमसी पाणी विभागाला तत्काळ देणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी निधी देऊन कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. मात्र त्याही मुद्द्यावर सेनेने वेगळाच सूर आळवला. मराठवाड्याला सात टीएमसीपेक्षा थेंबभरही अधिक पाणी मिळण्याची शक्यता नसल्याचे शिवतारे म्हणाले. -कोणत्याही खोऱ्यातून मराठवाड्याला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही. शिवाय ७ टीएमसी पाणीही आंध्र प्रदेशच्या धरणावर अवलंबून असून, त्यासाठीही साडेचार हजार कोटींच्या निधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला.