शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

कोरड्या उल्हास नदीत आज येणार पाणी

By admin | Updated: June 11, 2016 03:50 IST

उल्हास नदीतील पाणीसाठा प्रचंड घटल्याने आणि अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने गेल्या आठवड्यापासून अनेक महापालिकांत पुन्हा पाणीबाणी निर्माण झाली

सुरेश लोखंडे,

ठाणे- उल्हास नदीतील पाणीसाठा प्रचंड घटल्याने आणि अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने गेल्या आठवड्यापासून अनेक महापालिकांत पुन्हा पाणीबाणी निर्माण झाली आहे. आधीच तीन ते चार दिवस कपात असतानाही उरलेल्या दिवशी पाणीपुरवठा घटल्याने नागरिकांत तीव्र संताप आहे. त्याची दखल घेत आंध्र धरणातून शुक्रवारी संध्याकाळी जादा पाणी सोडण्यात आले. हे पाणी शनिवारी संध्याकाळपर्यंत शहाडला येणार असून कोरड्या पडलेल्या उल्हास नदीची पाणीपातळी वाढण्याची चिन्हे आहेत. किमान उपसण्याइतका हा साठा वाढल्यास पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल. नदीची जलपातळी घटल्याने मोहने, जांभूळ व टेमघर येथून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. पाऊस पडण्याचे लक्षण दिसत नसल्यामुळे या धरणातून सोडण्यात येणारे ७०० ते ८०० एमएलडी पाणी आणखी काही दिवस पुरवावे म्हणून केवळ ५०० एमएलडीवर आणले. त्याचा फटका पाणीपुरवठ्याला बसला. त्यामुळे अनेक विभागांत गोंधळ उडाला. ओरड सुरू झाली. त्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने आंध्र धरणाच्या व्यवस्थापनाला पाणी सोडण्याची विनंती केल्याचे कार्यकारी अभियंता सुभाष वाघमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठाही कमी झाला आहे. धरणात पाणी आहे, पण ते पसरलेल्या स्वरूपात आहे. पाणी सोडणाऱ्या दरवाजांजवळ त्याची पातळी कमी आहे. >अद्याप पावसाचे लक्षण नाहीमागील वर्षी आजच्या दिवशी म्हणजे १० जूनला ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह ठाणे जिल्ह्यात ८५ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा १० तारीख उजाडल्यावरही पावसाचे लक्षण दिसत नसल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणातील पाणी दाबाने येत नसल्यामुळे शहरांना कमी पाणीपुरवठा होतो आहे. अशी स्थिती असली तरी बारवी व आंध्रा धरणात तीन आठवडे पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आणखी काही दिवसांत पाऊस न आल्यास शेवटच्या या टप्प्यातील काही दिवस पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार आहे.