शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कोरड्या उल्हास नदीत आज येणार पाणी

By admin | Updated: June 11, 2016 03:50 IST

उल्हास नदीतील पाणीसाठा प्रचंड घटल्याने आणि अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने गेल्या आठवड्यापासून अनेक महापालिकांत पुन्हा पाणीबाणी निर्माण झाली

सुरेश लोखंडे,

ठाणे- उल्हास नदीतील पाणीसाठा प्रचंड घटल्याने आणि अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने गेल्या आठवड्यापासून अनेक महापालिकांत पुन्हा पाणीबाणी निर्माण झाली आहे. आधीच तीन ते चार दिवस कपात असतानाही उरलेल्या दिवशी पाणीपुरवठा घटल्याने नागरिकांत तीव्र संताप आहे. त्याची दखल घेत आंध्र धरणातून शुक्रवारी संध्याकाळी जादा पाणी सोडण्यात आले. हे पाणी शनिवारी संध्याकाळपर्यंत शहाडला येणार असून कोरड्या पडलेल्या उल्हास नदीची पाणीपातळी वाढण्याची चिन्हे आहेत. किमान उपसण्याइतका हा साठा वाढल्यास पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल. नदीची जलपातळी घटल्याने मोहने, जांभूळ व टेमघर येथून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. पाऊस पडण्याचे लक्षण दिसत नसल्यामुळे या धरणातून सोडण्यात येणारे ७०० ते ८०० एमएलडी पाणी आणखी काही दिवस पुरवावे म्हणून केवळ ५०० एमएलडीवर आणले. त्याचा फटका पाणीपुरवठ्याला बसला. त्यामुळे अनेक विभागांत गोंधळ उडाला. ओरड सुरू झाली. त्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने आंध्र धरणाच्या व्यवस्थापनाला पाणी सोडण्याची विनंती केल्याचे कार्यकारी अभियंता सुभाष वाघमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठाही कमी झाला आहे. धरणात पाणी आहे, पण ते पसरलेल्या स्वरूपात आहे. पाणी सोडणाऱ्या दरवाजांजवळ त्याची पातळी कमी आहे. >अद्याप पावसाचे लक्षण नाहीमागील वर्षी आजच्या दिवशी म्हणजे १० जूनला ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह ठाणे जिल्ह्यात ८५ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा १० तारीख उजाडल्यावरही पावसाचे लक्षण दिसत नसल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणातील पाणी दाबाने येत नसल्यामुळे शहरांना कमी पाणीपुरवठा होतो आहे. अशी स्थिती असली तरी बारवी व आंध्रा धरणात तीन आठवडे पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आणखी काही दिवसांत पाऊस न आल्यास शेवटच्या या टप्प्यातील काही दिवस पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार आहे.