शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमृततुल्य हॉटेलमध्ये ग्लासऐवजी पाण्याच्या बाटल्या

By admin | Updated: May 16, 2016 01:09 IST

दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता प्रत्येकजण आपापल्या परीने पाणी कसे वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे

पुणे : राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता प्रत्येकजण आपापल्या परीने पाणी कसे वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. हॉटेल, उसाची गुऱ्हाळे, चहाची दुकाने, रस्त्यावरील छोटी-मोठी खाद्य पदार्थांच्या दुकानांमध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुण्याचे वैशिष्ट्य असलेले अमृततुल्य हॉटेलही पाणीबचतीच्या या मोहिमेत सहभागी झाले असून, ते वेगवेगळे उपाययोजना करून पाण्याची बचत करीत आहेत़ शहरातील कर्वे रस्ता, सदाशिव पेठ, नारायण पेठ येथील अमृततुल्य हॉटेलची लोकमत प्रतिनिधींनी पाहणी केली़ त्यात पाणी बचतीसाठीही हॉटेल अनेक नावीन्यपूर्ण उपाय करीत असल्याचे दिसून आले़ अमृततुल्य हॉटेल हे पुण्याचे एक वैशिष्ट्य आहे़ पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमित जाणाऱ्या अनेकांना आपल्या कार्यालयातील कामाची सुरुवात अमृततुल्य हॉटेलमधील चहा पिऊन केल्याशिवाय चैन पडत नाही़ पूर्वी या हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी ग्राहकांना ग्लास व तांब्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे ग्राहकांनी पाणी पिण्यास मागितले, तर त्यांना ग्लास भरून दिला जायचा. त्यातून ग्राहक थोडे पाणी प्यायचे आणि अर्धे पाणी टाकून द्यायचे. ही परिस्थिती लक्षात घेता आणि शहरातील पाण्याची अडचण समजून घेऊन अमृततुल्य चहाच्या प्रत्येक हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाण्याच्या बाटल्या ग्राहकांना पिण्यासाठी ठेवलेल्या आहेत.।श्री नंदूक्षणी निवास अमृततुल्य हॉटेलमधील अश्विन त्रिवेदी म्हणाले की, अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. आधी पाण्याची समस्या एवढी भेडसावत नव्हती़ त्यामुळे काही उपाययोजना करण्याची गरज नव्हती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. >पाण्याचा दुहेरी वापर नळाला पाणी असूनही पाणी वाया जाऊ नये म्हणून दोन वेगवेगळ्या भांड्यात पाण्याचा साठा करून काचेचे ग्लास स्वच्छ केले जातात. आणि उरलेले पाणी फरशी साफ करण्यासाठी वापरले जाते. >प्लॅस्टिकच्या ग्लासचा वापर पाण्याची नासाडी होऊ नये व ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या दिवशी पिण्याचे पाणी आले नाही, तर प्लॉस्टिकच्या ग्लासचा वापर केला जातो. या प्लॉस्टिक ग्लासमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. >या पाहणी दरम्यान हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला असता, माणकेश्वर अमृततुल्य हॉटेलचे शेखर चव्हाण म्हणाले की, पाणी म्हणजे जीवन. हे फक्त पुस्तकातच वापरले जाते; पण त्याचा प्रत्यक्ष जीवनातही अवलंब केला पाहिजे. याच उद्देशाने आम्ही गेल्या ४ वर्षांपासून पाण्याच्या ग्लासऐवजी बाटलीचा वापर करतो. त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही. >दुष्काळाची परिस्थिती पाहता शहरात एकदिवसाआड पाणी सोडले जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून कसे वापरता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - एम. पी. त्रिवेदी, नागनाथ भुवन अमृततुल्य, नारायण पेठ