शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२००० नंतरच्या झोपड्यांना पाणी

By admin | Updated: June 18, 2016 01:24 IST

बेकायदा झोपड्यांना पाणीपुरवठा नाकारणाऱ्या शिवसेना- भाजपा युतीमधील मानवता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जागी झाली आहे़ त्यानुसार सन २००० नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा

मुंबई : बेकायदा झोपड्यांना पाणीपुरवठा नाकारणाऱ्या शिवसेना- भाजपा युतीमधील मानवता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जागी झाली आहे़ त्यानुसार सन २००० नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने आज शिक्कामोर्तब केले़ मात्र यामध्ये पदपथ व रस्ते, खासगी जमीन, प्रकल्पबाधित आणि समुद्रकिनाऱ्यावरील अशा झोपड्यांना वगळून युतीने लोकांच्या तोंडाला प्रत्यक्षात पाने पुसली आहेत़राज्य सरकारच्या धोरणानुसार सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र पाणी हक्क समितीने २०१२ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सरसकट सर्वांना पाणी मिळण्याची मागणी केली़ यावरील सुनावणीत न्यायालयाच्या आदेशानुसार सन २००० नंतरच्या सर्व झोपड्यांना पाणी देण्याचे धोरण पालिकेने तयार केले आहे़ मात्र सुरुवातीपासूनच शिवसेनेने या प्रस्तावाच्या विरोधात गेली दीड वर्षे भूमिका घेतली होती़ मात्र पुढच्या वर्षी पालिका निवडणुका असल्याने आतापर्यंत बेकायदा वाटणाऱ्या झोपड्यांसाठी शिवसेनेच्या हृदयाला अचानक पाझर फुटला आहे़ त्यामुळे दीड वर्षे रखडलेला हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला़ पालिका महासभेचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर सन २००० नंतरच्या झोपड्यांना दिलासा मिळेल़ परंतु पालिकेने टाकलेल्या अटींमुळे प्रत्यक्षात मोजक्याच झोपड्यांना याचा लाभ होणार आहे़ (प्रतिनिधी)मनसेचा विरोध कायममुंबईत दाखल होणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे़ बेकायदा झोपड्यांना पाणीपुरवठा केल्यास प्रामाणिक करदात्यांवर हा अन्याय असेल, अशी नाराजी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली़ या नियमांमुळे निम्म्या झोपड्या बादसरसकट सर्वांना पाणी या धोरणातून पदपथ व रस्त्यांवरील झोपड्या, खासगी जमिनीवरील अघोषित झोपड्या, समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात असलेल्या परंतु गावठाण व भूवापर सर्वेक्षणात न येणाऱ्या झोपड्या तसेच सार्वजनिक उपयोगाकरिता विकसित झालेल्या जमिनीवर वसलेल्या झोपड्या तसेच पालिका अथवा राज्य शासनाच्या प्रकल्पात बाधित झोपड्या व न्यायालयीन प्रतिबंध केलेल्या परिसरातील झोपड्यांना पाणीपुरवठ्याच्या धोरणातून वगळण्यात आले आहे़भाजपाचा मानवतेचा सूर२०१६ मध्ये उभ्या राहिलेल्या इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही तरी पाणीपुरवठा होतो; मग झोपड्यांना का नाही, असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला़ पाणी मिळाले तरी बेकायदाचबेकायदा झोपड्यांना पाणीपुरवठा केल्यानंतरही त्यांचे पाणीबिल रहिवासी दाखल ठरू शकत नाही़ त्यांच्यावर पालिकेची कधीही कारवाई होऊ शकते, असे नियमही टाकण्यात आले आहेत़गळती व चोरीवर तोडगाबेकायदा झोपड्यांमध्ये चोरी व गळतीने वाया जाणारे सुमारे ७०० दशलक्ष लीटर पाणी दररोज वाचविणे शक्य होईल, असा विश्वास पालिकेला वाटत आहे़पाण्याचे दर जास्तच : मुंबईतील ५४ टक्के लोकवस्ती झोपड्यांमध्ये राहते़ बेकायदा झोपड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ या झोपड्यांवर कारवाई करण्यात पालिका असमर्थ ठरली आहे़ पाणीमाफिया जलजोडण्या फोडून या झोपड्यांना दामदुप्पट दराने पाणी विकत आहेत़ त्यामुळे बेकायदा झोपड्यांना प्रती हजार लीटर चार रुपये ३२ पैसे या जादा दराने पाणीपुरठा करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला़