शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

आसूदमध्ये बागायतीला ३६५ दिवस पाणी!

By admin | Updated: December 27, 2015 01:49 IST

कायमस्वरूपी पाण्याचा ओघ असलेले गाव आता मोठ्या मुश्किलीनेच सापडेल. डिसेंबर-जानेवारीपासूनच पाणी कमी होऊ लागते आणि फेब्रुवारीपासून उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले जाते.

- शिवाजी गोरे,  दापोली

कायमस्वरूपी पाण्याचा ओघ असलेले गाव आता मोठ्या मुश्किलीनेच सापडेल. डिसेंबर-जानेवारीपासूनच पाणी कमी होऊ लागते आणि फेब्रुवारीपासून उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद हे गाव मात्र त्याला अपवाद आहे. या गावातल्या ३५0 एकर क्षेत्रातील बागायतीला ३६५ दिवस २४ तास पाणी मिळते. गावात ५00 वर्षांपूर्वीच पाण्याचे असे नियोजन करण्यात आले आहे की, आताही गावाला गुरुत्वाकर्षणाने मुबलक पाणी मिळते.नारळ-पोफळीच्या बागांमुळे ‘आसूद बाग’ या नावाने हे गाव ओळखले जाते. कोकणातील प्राचीन बागांचा उत्कृष्टनमुना येथे पाहायला मिळतो. शेतकऱ्यांनी वर्षाचे ३६५ दिवस २४ तास प्रत्येक मिनिटाचे पाणी नियोजन करून लोकसहभागातून नदीवर बंधारा बांधून गुरुत्वाकर्षणाने पाटाने आणून बागा फुलविल्या आहेत. राज्यात एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना गावातील शेतकऱ्यांनी पाणी नियोजनाचा आदर्श घालून दिला आहे.कोकणात धो-धो पडणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष पाहायला मिळते. दरवर्षी अनेक गावे, वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. आसूद गाव मात्र याला अपवाद आहे. वणद आसूद या दोन्ही गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीवर बंधारा घालून २ किलोमीटरवरून पाटाने पाणी आणले जाते. त्यावर बागायती होते.पावसाळा संपल्यानंतर नदीवर शेतकरी श्रमदान करून बंधारा बांधतात. बंधारा बांधणे, पाटाची डागडुजी यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे वर्गणी काढली जाते. क्षेत्रफळाप्रमाणेच पाणीवाटप केले जाते. २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो. प्रत्येकाच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे त्याने पाणी घ्यायचे असते. पाणी नियोजनाची समिती : नियोजनबद्ध पाणी मिळण्यासाठी एक समिती केली आहे. सर्व ४0 बागायतदार समितीचे सभासद आहेत. वर्षातून एकदा बैठक होते. तासाला ५ रूपये प्रमाणे पाणीवाटप होते. स्वत:च्या वाट्याचे पाणी घेतल्यानंतर प्रवाह बदलून दुसऱ्या शेतकऱ्याला दिला जातो. रात्रीच्या वेळेतही हे काम नियोजनानुसारच होते.- विनोद देपोलकर : अध्यक्ष, पाणी नियोजन समिती