शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

दुष्काळाच्या एसटीलाही झळा; २० दिवसांत ४३ कोटींचे उत्पन्न घटले

By admin | Updated: May 23, 2016 04:29 IST

राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल

सुशांत मोरे, मुंबईराज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे एसटी महामंडळाला थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा दुष्काळाची झळ वाढली असून, मे महिन्याच्या २० दिवसांत ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले आहे. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर १00 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती खूपच तीव्र झाली असून, पाण्याअभावी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावरच होत आहे. दुष्काळामुळे अनेक जण स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यावरचा प्रवासही टाळत आहेत. प्रवास टाळत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. मागील वर्षीच्या १ ते २0 मेपर्यंत भारमान हे जवळपास ६५ टक्के एवढे होते. या वर्षीच्या मे महिन्यातील याच दिवसांत भारमान ५९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तुलना केल्यास जवळपास सहा टक्क्यांनी भारमान घसरले असून, त्यामुळे महामंडळाला मे महिन्यात ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मराठवाडा विभागात औरंगाबाद क्षेत्रातील औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी विदर्भात नागपूर क्षेत्रातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा तर खान्देशात नाशिक क्षेत्रातील जळगाव, अहमदनगर, धुळे, नाशिकमध्ये दुष्काळाचा एसटीवर सर्वांत जास्त परिणाम झाला आहे. एप्रिलनंतर दिलासा नाहीच : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत दुष्काळामुळे एसटीला ३१ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले होते. एप्रिल महिन्यात लग्नसराई असल्याने भारमान थोडेफार वाढले होते. मात्र मे महिना सुरू होताच भारमान हळूहळू घसरू लागले. वाढते तापमानही कारणीभूत : दुष्काळाबरोबरच राज्यातील काही भागांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढही झाली आहे.

त्यामुळे अनेक जण प्रवास टाळत असून, त्याचा थेट परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होत असल्याचे सांगण्यात आले. 1मुंबई क्षेत्रातील (मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, ठाणे)४.६५ टक्क्यांनी, पुणे क्षेत्रात(कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर) भारमान ५ टक्क्यांनी आणि अमरावती क्षेत्रातील (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ) भारमान ५.८१ टक्क्यांनी घसरले आहे. 2मराठवाड्यात मे महिन्यातील याच दिवसांत तुलनेने भारमान जास्त असते. मागील वर्षीच्या मे महिन्यात मराठवाड्यात ६९ टक्के असणारे भारमान यंदाच्या मे महिन्यात तब्बल आठ टक्क्यांनी घसरले आहे. तर विदर्भात जवळपास ६ टक्क्यांपर्यंत भारमान घसरले

असून, खान्देशात हेच प्रमाण सात टक्क्यांपर्यंत आहे3राज्यात दुष्काळी परिस्थिती खूपच तीव्र झाली असून, पाण्याअभावी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावरच होत आहे. दुष्काळामुळे अनेक जण स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यावरचा प्रवासही टाळत आहेत. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर १00 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.