शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांवर वॉच

By admin | Updated: July 2, 2016 02:59 IST

पालिकेने २०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग’ प्रणाली अमलात आणली होती.

भार्इंदर : पालिकेने २०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग’ प्रणाली अमलात आणली होती. परंतु, त्यात काही फारसे नसल्याचे कारण देत तत्कालीन आयुक्तांनी ती बंद केली होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठी स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रणालीला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शहरातील गटारे, नाले, रस्ते, पूल ही कामे होतात. ही कामे वेळेत व योग्यरीत्या पूर्ण होतात की नाही, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे अन्य कामांवर परिणाम होत असल्याने ती वेळेत पूर्ण होत नाहीत. कामांचा वेळेत निपटारा व सुरू असलेल्या कामांवर एकाच वेळी नियंत्रण ठेवण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली होती. यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणचे दृश्य थेट ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीआरएस) प्रणालीद्वारे मोबाइल अथवा टॅबवर पाहता येत होते. यामुळे विभागप्रमुख व आयुक्तांचे त्यावर थेट नियंत्रण असायचे. कामात काही गैर होत असल्यास जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यास वरिष्ठांकडून त्या ठिकाणी भेट दिली जायची. झाडाझडती घेऊन त्यावर कारवाई केली जात होती. यात शिस्तीचा पायंडा पडल्याने कामांचा निपटारा वेळेत व योग्यरीत्या होऊ लागला होता. विक्रमकुमार यांच्या बदलीनंतर ही प्रणाली त्यानंतरच्या तत्कालीन आयुक्तांना रुचली नाही. परिणामी, ती बंद झाल्याने कामांमध्ये अनियमितता व गैरप्रकाराचे पेव फुटले. त्याला आळा घालण्यासाठी ही प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. त्याला समितीने मान्यता दिल्याने ही प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)>अन्य विभागही प्रणालीत आणाप्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी ‘व्हीएमएस माय सिटी’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. त्यावरून, नागरिकांना विविध प्रकारच्या तक्रारी समस्यांच्या ठिकाणांहूनच प्रशासनाला मोबाइलद्वारे पाठवता येणार आहे. यानंतर, पुन्हा मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली आहे. ती केवळ सार्वजनिक बांधकाम विभागापुरती मर्यादित आहे. या प्रणालीच्या कक्षेत इतरही विभाग समाविष्ट करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.