शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विकासकामांवर वॉच

By admin | Updated: July 2, 2016 02:59 IST

पालिकेने २०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग’ प्रणाली अमलात आणली होती.

भार्इंदर : पालिकेने २०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग’ प्रणाली अमलात आणली होती. परंतु, त्यात काही फारसे नसल्याचे कारण देत तत्कालीन आयुक्तांनी ती बंद केली होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठी स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रणालीला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शहरातील गटारे, नाले, रस्ते, पूल ही कामे होतात. ही कामे वेळेत व योग्यरीत्या पूर्ण होतात की नाही, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे अन्य कामांवर परिणाम होत असल्याने ती वेळेत पूर्ण होत नाहीत. कामांचा वेळेत निपटारा व सुरू असलेल्या कामांवर एकाच वेळी नियंत्रण ठेवण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली होती. यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणचे दृश्य थेट ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीआरएस) प्रणालीद्वारे मोबाइल अथवा टॅबवर पाहता येत होते. यामुळे विभागप्रमुख व आयुक्तांचे त्यावर थेट नियंत्रण असायचे. कामात काही गैर होत असल्यास जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यास वरिष्ठांकडून त्या ठिकाणी भेट दिली जायची. झाडाझडती घेऊन त्यावर कारवाई केली जात होती. यात शिस्तीचा पायंडा पडल्याने कामांचा निपटारा वेळेत व योग्यरीत्या होऊ लागला होता. विक्रमकुमार यांच्या बदलीनंतर ही प्रणाली त्यानंतरच्या तत्कालीन आयुक्तांना रुचली नाही. परिणामी, ती बंद झाल्याने कामांमध्ये अनियमितता व गैरप्रकाराचे पेव फुटले. त्याला आळा घालण्यासाठी ही प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. त्याला समितीने मान्यता दिल्याने ही प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)>अन्य विभागही प्रणालीत आणाप्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी ‘व्हीएमएस माय सिटी’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. त्यावरून, नागरिकांना विविध प्रकारच्या तक्रारी समस्यांच्या ठिकाणांहूनच प्रशासनाला मोबाइलद्वारे पाठवता येणार आहे. यानंतर, पुन्हा मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली आहे. ती केवळ सार्वजनिक बांधकाम विभागापुरती मर्यादित आहे. या प्रणालीच्या कक्षेत इतरही विभाग समाविष्ट करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.