शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

उष्णतेचा कहर, आणखी तीन बळी

By admin | Updated: May 20, 2016 01:48 IST

अकोला जिल्ह्यात तापमानाचा कहर; उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली.

अकोला: जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरूच असून, गुरुवारी उष्माघातामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. बोरगाव मंजू येथील गजानन मोहे (६0) हे बुधवारी नेहमीप्रमाणे गावातील शेळ्य़ा घेऊन जंगलात घेऊन गेले होते. प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी ते झाडाखाली विसावले; मात्र अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते कोसळले. ही घटना माहीत पडताच नातेवाइकांनी त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलविले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन मोहे यांच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे मोहे कुटंब उघड्यावर पडले असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मोहे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गांधीग्राम येथील अरुण भाऊराव मांजरे ( ६0) या वृद्ध मनोरुग्णाचा उन्हामुळे मृत्यू झाला. मांजरे हे गावात नेहमी भटकत होते. १८ मे रोजी तीव्र उन्हामध्ये अनेकांना मांजरे फिरताना आळळले. उन्ह जिव्हारी लागल्याने ते मरण पावले. तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे उष्माघाताने शेतमजूर मृत्यूमुखी पडला. शांताराम शंकर खोडे (४१) हे शेतमजुरीकरिता मिळेल तेथे होते. १९ मे रोजी भुईमुगाचे कुटार आणण्याकरिता शेतात गेले. घरी परत आल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली व ते खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक शांताराम खोडे अविवाहित होते. दरम्यान, बुधवारी भांबेरी येथील गणेश गुलाबराव खंडागळे (५0) आणि चिखलगाव येथील एका ६५ वर्षे अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला.