शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

उष्णतेचा कहर, आणखी तीन बळी

By admin | Updated: May 20, 2016 01:48 IST

अकोला जिल्ह्यात तापमानाचा कहर; उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली.

अकोला: जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरूच असून, गुरुवारी उष्माघातामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. बोरगाव मंजू येथील गजानन मोहे (६0) हे बुधवारी नेहमीप्रमाणे गावातील शेळ्य़ा घेऊन जंगलात घेऊन गेले होते. प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी ते झाडाखाली विसावले; मात्र अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते कोसळले. ही घटना माहीत पडताच नातेवाइकांनी त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलविले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन मोहे यांच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे मोहे कुटंब उघड्यावर पडले असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मोहे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गांधीग्राम येथील अरुण भाऊराव मांजरे ( ६0) या वृद्ध मनोरुग्णाचा उन्हामुळे मृत्यू झाला. मांजरे हे गावात नेहमी भटकत होते. १८ मे रोजी तीव्र उन्हामध्ये अनेकांना मांजरे फिरताना आळळले. उन्ह जिव्हारी लागल्याने ते मरण पावले. तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे उष्माघाताने शेतमजूर मृत्यूमुखी पडला. शांताराम शंकर खोडे (४१) हे शेतमजुरीकरिता मिळेल तेथे होते. १९ मे रोजी भुईमुगाचे कुटार आणण्याकरिता शेतात गेले. घरी परत आल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली व ते खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक शांताराम खोडे अविवाहित होते. दरम्यान, बुधवारी भांबेरी येथील गणेश गुलाबराव खंडागळे (५0) आणि चिखलगाव येथील एका ६५ वर्षे अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला.