शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

कोरडवाहू शेती अभियान वा-यावर!

By admin | Updated: January 26, 2015 00:34 IST

अध्यक्षाच्या राजीनाम्यानंतर अभियान पडले थंड बस्त्यात; अशासकीय समितीही बरखास्त.

अकोला : कोरडवाहू शेती क्षेत्राला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला राज्यातील ४0३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. दोन हजार कोटी रूपये या अभियानावर खर्च होणार आहेत; तथापि या अभियानाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला असून, शासनाने या अभियान देखरेखीसाठी स्थापन केलेली अशासकीय समितीही बरखास्त केल्याचे वृत्त असल्याने कोरडवाहू शेती अभियान थंड बस्त्यात पडले आहे.राज्यातील २२५ लाख हेक्टरपैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेला बसत असल्याने या क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. कोरडवाहू क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचे नियोजन, तसेच कृषीपूरक उपक्रमांसाठी साहाय्य केल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवता येईल, उत्पन्नाचे सातत्य टिकवता येईल आणि त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल, या उद्देशाने राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियानाची मागील वर्षापासून सुरुवात केली असून, याकरिता मनुष्यबळ विकास व शेतीला लागणारी विविध संसाधने, प्रक्रिया व पणन या घटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या योजनेला अधिक कार्यक्षमतेने राबविण्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद कोरडवाहू शेती अभियान योजनेस स्वतंत्ररीत्या उपलब्ध करू न देण्यात आली असून, अभियानांतर्गत राज्यासह अकोला जिल्हय़ातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जलसंचय व्यवस्थापन कार्यक्रमासह एकात्मिक शेती पद्धती, मूल्यवर्धित शेती विकास, सेंद्रिय शेती कार्यक्रम, काढणीपश्‍चात साठवूणक, प्रक्रिया आणि शेतकर्‍यांना प्रशिक्षण आदी विकासात्मक बाबींवर भर दिला जाणार आहे. कोरडवाहू क्षेत्रात पाणी हा महत्त्वाचा घटक असल्याने पावसाच्या पाण्याची साठवण, नियोजन आणि वापर अर्थात मूलस्थानी जलसंवर्धन यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, हे अभियान कार्यक्षमतेने राबविण्यासाठी राज्य शासनाने शासकीय व अशासकीय समितीचे गठण केले होते. तज्ज्ञ म्हणून या शासकीय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. थोरात यांची नेमणूक केली होती. तथापि डॉ. थोरात यांनी या समितीच्या अध्यपदाचा राजीनामा दिला आहे आणि शासनाने पुन्हा अध्यक्षांची नेमणूूक न करता अशासकीय समितीच बरखास्त केली आहे.राज्याच्या कोरडवाहू शेती अभियानाचे अध्यक्ष डॉ. वायपीएस थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्याच्या कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी कोरडवाहू शेती अभियान मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त करून समिती नावालाच उरल्याने एक महिन्यापूर्वीच राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.