शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अव्वल!

By admin | Updated: April 15, 2017 00:43 IST

वाशिम- स्वच्छ महाराष्ट्र या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्याने पहिल्या पाचमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

स्वप्नातील भारत : अमरावती महापालिका दुसऱ्या स्थानावरवाशिम : ग्रामीण तथा शहरी भाग हगणदरीमुक्ती करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्याने पहिल्या पाचमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर अमरावती महापालिकेने या अभियानात दुसरे स्थान पटकाविले असून, पुणे महानगरपालिका अव्वल स्थानी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाला केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वच्छता अभियानाला महत्त्व दिले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्याच धर्तीवर राज्यातील ग्रामीण भागातील खेडे आणि शहरे हगणदरीमुक्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हगणदरीमुक्तीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका स्तरावर शासकीय अनुदानातून शौचालयांची निर्मिती केली जात आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची ‘टॉप’ फाइव्ह आणि नकारात्मक कामगिरी करणाऱ्या संस्थांची ‘बॉटम’ फाइव्ह अशी वर्गवारी करण्यात येत आहे. यामध्ये नवीन आणि जुन्या शौचालयाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये वाशिम जिल्ह्याने १५५ टक्के उद्दिष्टपूर्तीकरीत पहिले स्थान पटकाविले आहे. दुसरे स्थान कोल्हापूर (१०९ टक्के), तर तिसऱ्या स्थानी ठाणे जिल्हा (८५ टक्के) आहे. तर नकारात्मक कामगिरी करणाऱ्यांमध्ये गडचिरोली (२६ टक्के), यवतमाळ, जालना (४३ टक्के), परभणी (४४ टक्के) जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचवेळी महानगरपालिका क्षेत्रात पुणे महानगरपालिकेने (२७१ टक्के) पहिले स्थान पटकाविले असून, विदर्भातील अमरावती महानगरपालिका (१२७ टक्के) दुसऱ्या तर वसई विरार महापालिका (१०१ टक्के) तिसऱ्या स्थानी आहे.ग्रामीण भागात कारंजा दुसऱ्या स्थानी!स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये ग्रामीण क्षेत्रात पन्हाळा (४६७ टक्के) उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून पहिल्या स्थानी आहे. ग्रामीण भागात कारंजा (४१८ टक्के) दुसऱ्या स्थानावर, तर अरधापूर (१६० टक्के) उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून तिसऱ्या स्थानी आहे. ग्रामीण क्षेत्रात कामठी, घाटंजी, लोणार कमालीचे माघारले गेले आहे. कामठी येथे केवळ ९ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्याचप्रमाणे घाटंजी ११ आणि लोणार १६ टक्के उद्दिष्टपूर्तीसह पिछाडीवर आहेत.सुमार कामगिरी करणाऱ्या महापालिका!या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये राज्यातील महानगरपालिकांनी अतिशय सुमार कामगिरी केली आहे. यामध्ये ग्रेटर मुंबई (७ टक्के), परभणी (२४ टक्के) तर भिवंडी महानगरपालिकेने (२५ टक्के) उद्दिष्टपूर्ती केली आहे.