शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

श्रमजीवी संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By admin | Updated: August 17, 2015 01:00 IST

मुंबईसह ठाणे, पालघरमधील आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर श्रमजीवी

अनगाव : मुंबईसह ठाणे, पालघरमधील आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर श्रमजीवी संघटनेचे तरुण, युवा-युवती कार्यकर्ते प्रवेश करून मुख्यमंत्र्यांना घेराव घालतील, असा इशारा संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी गणेशपुरी येथील स्वातंत्र्य दिन सोहळ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिला.आजही मुंबईसह ठाणे-पालघर जिल्ह्यातील आदिवासींना पाणी, वीज रस्ते, हक्काचे शिक्षण या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. कुपोषण, आश्रमशाळेत पोषण आहार, आरोग्य सेवेचा बोजवारा या समस्या सोडविण्यात याव्यात, याकरिता एप्रिल महिन्यात नॅशनल पार्क नवापाडा, चुनापाडा, गोरेगाव येथील प्रजापुरा भरीखानपाडा अशा मुंबईतील २२२ आदिवासी पाड्यांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने तेथील आदिवासींनी एप्रिल महिन्यात इच्छामरण द्या, याकरिता मंत्रालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा शिष्टमंडळाबरोबर लवकरच बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तो दिवस अजूनही येत नसल्याने आपला हक्क मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि ते वर्षा बंगल्यावर प्रवेश करून दाखवून घ्या, असे आवाहन विवेक पंडित यांनी कार्यकर्त्यांना केले. वजे्रश्वरी ते गणेशपुरी अशी भव्य स्वातंत्र्य दिनाची मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी समाजसेवक स्व. रशीद शहा यांच्या नावाने सुरू केलेल्या पुरस्काराने समाजातील कार्यकर्त्यांना विवेक पंडित व अध्यक्षा विद्युल्लता पंडित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.