शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

वारकरी निघाले आळंदीला

By admin | Updated: November 19, 2016 03:13 IST

उत्पती एकादशीनिमित्त २५ नोव्हेंबरला ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत यात्रा संपन्न होत आहे.

नागोठणे : उत्पती एकादशीनिमित्त २५ नोव्हेंबरला ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत यात्रा संपन्न होत आहे. माऊलींचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून वारकरी मंडळींच्या दिंडींनी आळंदीकडे प्रस्थान केले आहे. येथील ज्ञानेश्वर मंदिरातून ह.भ.प. नामदेव महाराज यादव (तामसोली), ह.भ.प. मारुती महाराज कोल्हटकर (तळवली), ह. भ. प. दगडूमहाराज दळवी (वांगणी) यांच्या नेतृत्वाखाली शुक्र वारी सकाळी दिंडीने आळंदीकडे प्रस्थान केले असून त्यात नागोठणे आणि मेढे विभागातील शेकडो भाविक सहभागी झाले आहेत.पेण तालुक्यातील तरशेत संत सेवा मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडीने सुद्धा शुक्रवारी तरशेत येथून दिंडीप्रमुख ह.भ.प. निवासमहाराज शिंदे, ह. भ. प. शांताराम महाराज मेस्त्री आणि चिंतामण महाराज घासे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान केले. त्यात सुद्धा शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. वडखळ - पेणमार्गे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी दुपारी पळस येथे प्रसादाचे भोजन ठेवण्यात आले होते. ह. भ. प. हिराजीमहाराज शिंदे, शिवराम शिंदे आणि ग्रामस्थांनी पळस येथे दिंडीचे स्वागत केले. या दिंडीत विभागातील तरशेत, जांभुळतेप, मुंढाणी, शिहू, चोळे, गांधे, आमराई, बेणसे, धुळवड, शेतजुई आदी गावांतील वारकरी सहभागी झाले आहेत. ह. भ.प. हरिश्चंद्र महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी १९ नोव्हेंबरला खारपाले येथील गुरु कुलातून निघणाऱ्या दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्यात खारपाले, देवळी, पेण, तुरमाळ, चरी - पळी, पळस, वाघळी, तळवली, तिसे, कामथ, रु द्रवली, कोलाड, पाटणूस, बिहरीची वाडी, डोंबिवली, लालडोंगर, नरखेड (सोलापूर) बिडवाडी, पिसे कामते, कणकवली (सिंधुदुर्ग) आदी ठिकाणच्या श्री गणेश सत्संग मंडळाचे वारकरी सहभागी होणार आहेत. या दिंडी सोहळ्यात वस्तीच्या ठिकाणी दररोज रात्री ह. भ.प. हरिश्चंद्र महाराज पाटील यांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन होणार आहे. (वार्ताहर)