मुंबई : वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी राज्यसभेचे खासदार या नात्याने विजय दर्डा यांनी अथक प्रयत्न केले. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याचे संपूर्ण श्रेय विजयबाबूंचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पास विजयबाबूंच्या प्रयत्नांमुळे हिरवा झेंडा मिळाला. आता त्यासाठी निधीची भरीव तरतूद करून राज्यातील इतर चार रेल्वे प्रकल्पांसोबतच तो देखील गतीने पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागिदारीतून (स्पेशल पर्पज व्हेईकल) या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. चार वर्षांत राज्यातील मागास भागांना जोडणारे रेल्वेचे जाळे उभारलेले दिसेल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे श्रेय विजयबाबूंचे!
By admin | Updated: September 14, 2016 06:46 IST