शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

वर्धा: दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 13:43 IST

दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना वर्ध्यातील किन्हाळा येथे घडली.

ऑनलाइन लोकमत
समुद्रपूर (वर्धा), दि. २६ -  दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही हृदयद्रावक घटना समुद्रपूर तालुक्यातील किन्हाळा या गावात घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तुषार गजानन अवचट (५), अनुष्का गजानन अवचट (९) व पूनम गजानन अवचट यांचा समावेश आहे.
किन्हाळा येथील दादाजी अवचट यांचा एकमेव मुलगा गजानन यांचा राळेगाव तालुक्यातील वणोजा येथील हनुमान उगेमुगे यांची मुलगी पुनम सोबत १० वर्षापुर्वी विवाह झाला होता. या कालावधीत त्यांच्या संसाराच्या वेलीवर अनुष्का (९) व तुषार (५) ही दोन फुले उमलली. सुखात संसार सुरू होता. अनुष्का हिंगणघाटच्यास गुरूकुल कान्व्हेंटमध्ये दुसऱ्या वर्गात जात होती. तर तेथेच तुषार नर्सरीमध्ये जात होता. घरी ८ एकर शेती, गजानन एकटाच असल्याने संपूर्ण शेतीचा कारभार गजाननची पत्नी पुनम पाहायची. मात्र यातच कुणाची तरी नजर लागावी याप्रमाणे घरामध्ये सासु-सासराच्या वादामुळे पुनमने दोन्ही मुलासह आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सासरे दादाजी अवचट व सासु ही अर्धांग वायुने आजारी आहे.  मात्र या दोघामध्ये कश्याच्या तरी संबंधात वाद झाला. तेव्हा पुनमला वाटल की लोक म्हणतील सुनेमुळेच सासुसासरे भांडतात व त्याचेच तिच्या डोक्यात घर केले होते, असेही बोलले जात आहे.
सोमवारी सकाळी तुषार हा शाळेत गेला होता तर मुलगी अनुष्काला तीने शाळेत जाण्यासाठी मनाई केली होती. मुलगा शाळेतून आल्यावर जेवन घेतले व ३ वाजताचे दरम्यान बाहेर खेळत असलेल्या तुषार व अनुष्काला घेवून पुनम शेताकडे निघाली. तेव्हा रस्त्यात गावातील एक म्हातारा भेटला तेव्हा त्याने विचारपूस केली. पाऊस येण्याची शक्यता आहे व यामध्ये मुलांना घेवून कुठे जात आहे. तेव्हा शेतात जाऊन येते, असे तीने सांगितले व पुढे जाऊन पुंडलिक बदकल यांचे शेतातील विहिरीत मुलासह उडी घेवून आत्महत्या केली.
सदर महिलेचा शोध घेतला असता आज तिघाचेही मृतदेह विहिरीत आढळून आले. घटनास्थळ गावापासून दोन किलोमिटर अंतरावर आहे. तीथे संपूर्ण गाव विहिरीवर गोळा झाले होते. विहिरीत तरंगत असलेल्या गोंडस मुलांकडे पाहून महिला हंबरडा फोडत होते.पुनमच्या माहेरच्या मंडळींनी आक्षेप नोंदवित घरच्याच्या त्रासापायीच आत्महत्या केली. तिला तिच्या कुटुुंबियांनी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची वडील हनुमान उगेमुगे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार रणजितसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस करीत आहे.