शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

भिंत कोसळून पाच ठार

By admin | Updated: June 23, 2015 02:32 IST

कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये अर्धवट बांधलेले जोते घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला

नेरळ (जि. रायगड) : कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये अर्धवट बांधलेले जोते घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या कुटुंबातील एक मुलगा नातेवाइकांकडे गेला होता, त्यामुळे तो वाचला. किसन राघो दिघे (५0), सुनंदा (४५), अर्चना (२0), स्वप्नेश (१९) आणि सुनंदा यांच्या आई जाईबाई कदम (६५) अशी मृतांची नावे असून त्यांच्या नातेवाइकांना सरकारकडून तत्काळ २० लाखांची मदत देण्यात आली. किसन दिघे यांच्या घराच्या वरच्या बाजूस असलेल्या अर्धवट बांधलेल्या घराचे जोते मुसळधार पाण्याने भुसभुशीत झाले होते. पहाटे ५.३0च्या सुमारास माती व दगडी भिंत खचली आणि दिघे यांच्या घरावर कोसळली. परिसरातील रहिवाशांनी आणि नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भरावाखाली दबलेल्या दिघे कुटुंबीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पाचही जणांचा मृत्यू झाला होता. स्वप्नेश दिघे हा रविवारी रात्री मासे आणि खेकडे पकडण्यासाठी गेला होता. तो पहाटे घरी परतला. मात्र काहीच तासांत काळाने त्याच्यावर घाला घातला. शवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी व्यवस्था नसल्याने मृतदेह दुपारपर्यंत उघड्यावरच ठेवण्यात आले होते.