शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भिंत कोसळून पाच ठार

By admin | Updated: June 23, 2015 02:32 IST

कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये अर्धवट बांधलेले जोते घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला

नेरळ (जि. रायगड) : कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये अर्धवट बांधलेले जोते घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या कुटुंबातील एक मुलगा नातेवाइकांकडे गेला होता, त्यामुळे तो वाचला. किसन राघो दिघे (५0), सुनंदा (४५), अर्चना (२0), स्वप्नेश (१९) आणि सुनंदा यांच्या आई जाईबाई कदम (६५) अशी मृतांची नावे असून त्यांच्या नातेवाइकांना सरकारकडून तत्काळ २० लाखांची मदत देण्यात आली. किसन दिघे यांच्या घराच्या वरच्या बाजूस असलेल्या अर्धवट बांधलेल्या घराचे जोते मुसळधार पाण्याने भुसभुशीत झाले होते. पहाटे ५.३0च्या सुमारास माती व दगडी भिंत खचली आणि दिघे यांच्या घरावर कोसळली. परिसरातील रहिवाशांनी आणि नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भरावाखाली दबलेल्या दिघे कुटुंबीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पाचही जणांचा मृत्यू झाला होता. स्वप्नेश दिघे हा रविवारी रात्री मासे आणि खेकडे पकडण्यासाठी गेला होता. तो पहाटे घरी परतला. मात्र काहीच तासांत काळाने त्याच्यावर घाला घातला. शवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी व्यवस्था नसल्याने मृतदेह दुपारपर्यंत उघड्यावरच ठेवण्यात आले होते.