शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पीक तसेच मुदत कर्जासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ

By admin | Updated: June 4, 2016 03:17 IST

अडीच लाखांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे

मुंबई : अडीच लाखांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीक कर्जाबाबतच्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला.१४ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून पीक कर्जाचा आढावा घेण्यात आला. पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सलग चार वर्ष दुष्काळी परिस्थिती असल्याने या आर्थिक वर्षासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. काही दिवसांत पेरणीला सुरूवात होईल. शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी पीक कर्ज वाटपाच्या कामात गती आली आली पाहिजे. याकामी ज्या समस्या आहेत त्या स्थानिक पातळीवर दूर करून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज कसे उपलब्ध होईल, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर आर्थिक भार न पडता सहजपणे पीक कर्ज मिळायला हवे. त्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत, त्यांची संख्या कमी करावी. कर्ज पुर्नगठन करतेवेळी ‘सर्च रिपोर्ट’ संदर्भात देखील रिझर्व्ह बँकेनेनव्याने पाठविलेल्या सूचना सर्व बँकाना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.दर आठवड्याला बँकांबरोबर बैठका घेऊन कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. पीक कर्जासाठीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, याकामी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन मोड’मध्ये काम करावे. वेळेत कर्ज मिळाल्यास शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल. ज्या बँका कजर्पुरवठा करण्याकामी दिरंगाई करतील. त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.बऱ्याच ठिकाणी पीक कर्जाचे पुर्नगठन करताना शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम बँकाकडून कापून घेण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने बँकांनी शेतकऱ्यांप्रती माणुसकी दाखवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. (प्रतिनिधी)