शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

शेतकऱ्यांकडील वीज थकबाकी माफ होणार

By admin | Updated: July 21, 2016 04:27 IST

विजबिलाची थकबाकी २० हजार कोटींची आहे, त्यापैकी शेतकऱ्यांकडे असलेली १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार

मुंबई : राज्यात विजबिलाची थकबाकी २० हजार कोटींची आहे, त्यापैकी शेतकऱ्यांकडे असलेली १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे आश्वासन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले. महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांवर यावर्षी पाच टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली असून वीज नियामक आयोगाचा निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, तसेच ओपन अ‍ॅक्सेसमधून वीज घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यापुढे अशा विजेवर वेगळा कर लावण्याचा निर्णय विभागातर्फे घेतला जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.राज्यात १९ टक्के वीज दरवाढ आकारुन ग्राहकांवर जादा बोझा टाकला जात असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य सदस्यांनी लक्षवेधी लावली होती. त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, राज्यात १९ टक्के दरवाढ ही एका वर्षात लावण्यात येणार नसून ती पाच वर्षासाठी मागण्यात आली आहे व अद्याप दरवाढ लागू झालेली नसून त्यावर आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. महावितरणकडे सध्या विजेच्या मागणीपेक्षा जास्त वीज असल्याने वीजनिर्मिती केंद्राचे बॅकडाऊन करावे लागत आहे. यात काही बॅकडाऊन हे ओपन अ‍ॅक्सेसमुळे करावे लागत आहेत. त्यामुळे यापुढे वीज निर्मिती केंद्रांना द्यावा लागणारा स्थिर आकार ओपन अ‍ॅक्सेसच्या ग्राहकांकडून वसूल करावा जेणेकरुन त्याचा भार महावितरणच्या अन्य ग्राहकांवर पडणार नाही. त्यासाठी ओपन अ‍ॅक्सेसवर अतिरिक्त कर लावण्याचा प्रस्तावही आयोगाकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>५६ हजार कोटींची दरवाढमहावितरणची उलाढाल ५८ हजार कोटींची आहे व प्रस्तावित दरवाढ ५६ हजार कोटींची आहे. याचा अर्थ दरवाढ अधिक होते, त्यामुळे स्वत:ची वीज निर्मिती बंद ठेवून खासगी वीज उत्पादकांकडून वीज खरेदी का केली जात आहे, असा सवाल वळसे पाटील यांनी केला. त्यावर कोणताही नवीन करार आपल्या सरकारने केला नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या विजबिलाची थकबाकी कधी रद्द करणार, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला. त्यावर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडे १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी काही रक्कम उपसा सिंचन योजनांंची आहे. जैतापूरचा प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाला विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.