शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

संत तुकाराम गाथा अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 7, 2015 12:04 IST

गाथारूपाने ‘शब्दधन जनलोका’ देऊन मराठी वाङ्मय समृद्ध करणाऱ्या संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आहे.

विश्वास मोरे, पिंपरीगाथारूपाने ‘शब्दधन जनलोका’ देऊन मराठी वाङ्मय समृद्ध करणाऱ्या संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आहे. अनुदान बंद झाल्याने आता गाथेची किंमत दुपटीने वाढली आहे. चौदा वर्षांत एक लाख पस्तीस हजार विक्री करून अक्षरवाङ्मयात गाथेने विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘आम्हा घरी धन, शब्दांची रत्ने...’ असे अक्षरांचे महत्त्व सांगून अभंगातून माणसांचे जीवन समृद्ध करणाऱ्या, भागवत धर्माच्या वारकरी संप्रदायाचा कळस, अर्थात संत तुकाराम महाराज यांच्या गाथेला दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता मिळत आहे. गाथेचा प्रवास पाहता, आजवर बाबासाहेब आजरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स. के. नेऊरगावकर, बॅरिस्टर बा. ग. परांजपे, शंकर पंडित, लक्ष्मणराव पांगारकर, पुरुषोत्तम लाड, संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा, वारकरी समाज संस्था यांनी तुकाराम गाथा संपादित केली होती. काहींनी धार्मिक अंगाने, तर काहींनी वैचारिक अंगाने सार्थ गाथा (पारायण प्रत) निर्माण केली आहे. साहित्य अकादमीसाठी डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी संक्षिप्त अभंगगाथा साकारली होती. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील अनेक संस्था, कीर्तनकारांनी गाथा प्रकाशित करून अक्षरधनात भर टाकली आहे. विठ्ठलभक्तीबरोबरच जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या, आत्मभान जागृत करण्याचे अलौकिक कार्य गाथेने केले आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून ‘तुकाराम गाथा’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी श्रीक्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतला. तुकोबारांयाचे वंशज व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांच्या हस्तलिखितांचा, वह्यांचा आधार घेऊन संशोधन करून अधिकृत गाथा प्रकाशित केली. तसेच, पहिल्यांदा तुकाराम डॉट कॉमच्या माध्यमातून दिलीप धोंडे यांनी ही गाथा आॅनलाईन उपलब्ध करून दिली होती. पहिल्या टप्प्यातील अनुदान संपल्यानंतर २००९मध्ये शासनाने- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा लाखांचे अनुदान दिले. त्यानंतर ७० हजार गाथांची निर्मिती केली. गाथेची किंमत झाली दुप्पट> सुंदर मुखपृष्ठ, उत्तम कागद, उत्कृष्ट बांधणी या गाथेचे वैशिष्ट्य असून, देवस्थानाने या गाथेस अधिकृत मान्यता दिली आहे. २००८पूर्वी या गाथेच्या एका प्रतीसाठी ८६ रुपये खर्च येत होता. त्या वेळी अनुदान असल्याने ही गाथा पन्नास रुपयांना विकली जात होती. मार्च २०१४पासून एका प्रतीसाठी ११० रुपये खर्च येत आहे. शिवाय, शासकीय अनुदानही संपले आहे. असे असताना केवळ ही गाथा शंभर रुपयांना विकली जात आहे. निर्मिती मूल्यापैकी दहा रुपयांचा भार देवस्थान उचलत आहे. तरच किंमत कमी होऊ शकेल> तुकाराम गाथा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे अनुदान मिळणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना सरकारने गाथेला अनुदान द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही अनुदानाबाबत सकारात्मकता दर्शविलेली आहे. शासनाकडून अनुदान मिळाले, तर वारकऱ्यांना पुन्हा पन्नास रुपयांना गाथा देणे शक्य होईल, असे मत संत तुकाराम देवस्थानाचे अध्यक्ष रामदास मोरे यांनी व्यक्त केले.