शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मान्सूनची प्रतीक्षाच!

By admin | Updated: June 14, 2016 03:04 IST

राज्यात मान्सून येण्यास अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुणे : राज्यात मान्सून येण्यास अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मान्सून ११ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज अगोदर भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. मात्र अनुकुल परिस्थिती निर्माण न झाल्याने अजून दोन-तीन दिवस तरी प्रतिक्षाच करावी लागणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी चांगला मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत रत्नागिरीमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पाऊस झाला. गेल्या २४ तासात विदर्भातील भिवापूर येथे ५० मिमी, मराठवाड्यातील बिलोली, परांडा येथे पत्येकी ५० मिमी पाऊस पडला. त्यापाठोपाठ म्हापसा, सांगे,तीतोरा येथे ४०, देवगड, मालवण, राजापूर, ब्रम्हपूरी, ईटापल्ली, लाखांदूर, मूलचेरा येथे ३०, भिरा, गुहाघर, कणकवली, कुडाळ, मुरूड, रोहा, सावंतवाडी, पाली, वैभववाडी, वेंगुर्ला, माढा, मोहोळ, पंढरपूर, भूम, अहिरी, आरमोरी, बल्लारपूर, तुमसर येथे २०, हर्णे, श्रीवर्धन, जेऊर, महाबळेश्वर, अंबेजोगाई, पाटोदा, शिंदेवाही येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.पाऊस येण्यास उशीर होत असल्याने विदर्भ, खान्देशामधील तापमान अजूनही चढेच आहे. आज राज्यात सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान उपराजधानी नागपूर येथे नोंदविले गेले. त्याव्यतिरिक्त जळगाव, अमरावती, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा येथील तापमान ४० अंशाच्या वर होते. (प्रतिनिधी)मॉन्सून कारवारमध्येच...अंदमानसह पश्चिम बंगालच्या उपसागरात वेगाने दाखल झालेला मॉन्सून केरळ, तामिळनाडू ओलांडल्यानंतर अद्यापही कारवारमध्येच रेंगाळला आहे. मॉन्सून पुढे सरकरण्यासाठी येथील परिस्थिती अनुकूल असली तरी येत्या ४८ तासांत त्याचा प्रवास मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांत, ईशान्यकडील काही राज्ये, उप-हिमालयाचा पश्चिम बंगाल भाग आणि सिक्कीमच्या काही भागांकडे होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.परिणामी मान्सूनच्या महाराष्ट्र आगमनाबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याने राज्याला पावसाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मुंबईसह राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी राज्याला मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. तर कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात वाढ झाली.मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मुंबईचा विचार करता येथेही मॉन्सूनपूर्व सरींनी विश्रांती घेतली असून, उकाड्यातील वाढ कायम आहे. परिणामी मुंबईकर ऊकाड्याने हैराण असून, येत्या ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.