शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांसह साऱ्यांनाच प्रतीक्षा मिनीट्रेनची...

By admin | Updated: March 3, 2017 02:27 IST

दहा महिन्यांपासूनच अनिश्चित काळासाठी बंद असल्याने गाडी सुरू होईल की नाही, या विवंचनेत स्थानिक नागरिक सध्या दिसत आहेत

मुकुंद रांजाणे,माथेरान- माथेरानची शान आणि आकर्षण असलेली नॅरोगेज मिनीट्रेन मागील दहा महिन्यांपासूनच अनिश्चित काळासाठी बंद असल्याने गाडी सुरू होईल की नाही, या विवंचनेत स्थानिक नागरिक सध्या दिसत आहेत. मात्र, पर्यटकांमध्ये गाडी लवकरच सुरू व्हावी, ही उत्सुकतादेखील पाहावयास मिळत आहे.मे २०१६मध्ये एकाच जागी दोनदा गाडीची बोगी घसरल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही सेवा ताबडतोब सुरू करण्यात यावी, यासाठी येथील राजकीय मंडळींनीही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित मंत्र्यांचे उंबरठे झिजविले; परंतु अद्याप या कामासाठी गती मिळालेली नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचीसुद्धा प्रत्यक्ष दिल्ली दरबारी, मुंबई येथे भेट घेऊन लेखी निवेदने दिलेली आहेत; परंतु आश्वासनांशिवाय काहीच प्राप्त झालेले नाही. मध्यंतरी काही भागात सुरू असलेली कासव गतीची कामेसुद्धा बंद पडल्याने मिनीट्रेन मे महिन्याच्याअखेरपर्यंत तरी सुरू होईल की नाही, याच विवंचनेत स्थानिक आहेत. पर्यटन हंगाम समीप येत आहे. त्यामुळे या गाडीच्या आधारावर सर्वांची आर्थिक व्यवहारांची मदार आहे.रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते ही गाडी २० कोटी रु पये तोट्यात गेलेली आहे; परंतु सन २०१० ते २०१६ याच कालावधीत या गाडीच्या एकूण ३५८४ फेऱ्या तांत्रिकदृष्ट्या रद्द करण्यात आल्याचे समजते. एकावेळेस दीडशे प्रवासी वाहण्याची क्षमता असणाऱ्या या गाडीच्या जेमतेम चार ते पाच फेऱ्या होत असत. त्यामुळे हा तोटा रेल्वेच्याच अनागोंदीमुळे त्यांनाच सोसावा लागलेला आहे. गाडीची सेवा बंद करून नाहक भुर्दंड प्रवाशांच्या माथी का लादला जात आहे, अस संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.नेरळ -माथेरान या अवघड डोंगर माथ्यातून कडवे आव्हान स्वीकारून आदमजी पिरभॉय आणि अब्दुल हुसैन आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सन १९०१ ते १९०७ या केवळ सात वर्षांत चौदा किलोमीटरचा रेल्वेमार्ग बनवून स्वखर्चाने त्याकाळी १६ लाख रु पये खर्चून रेल्वे प्रशासनाला ही गाडी पर्यटकांच्या सेवेसाठीच बहाल केली होती; परंतु रेल्वे प्रशासनाला या मार्गावर असणारे सूतभर कामसुद्धा जलदगतीने करता येत नाही. अपघात हे होतच असतात म्हणून काही रेल्वे सेवा बंद होत नाही, असे माथेरानकरांसह पर्यटकांचे म्हणणे आहे.गाडी लवकरच सुरू करून पर्यटकांना सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे.>देशात एकूण ११००० रेल्वेगाड्या नियमितपणे धावतात. यामध्ये सात हजार पॅसेंजर, तर ४००० मालगाड्या धावतात. यातून कोट्यवधी रु पये उत्पन्न मिळते, त्याप्रमाणेच मिनीट्रेनच्या माध्यमातूनही मिळते, मग ही सेवा बंद का? असा संतप्त प्रश्न स्थानिकांसह पर्यटकांकडून विचारण्यात येत आहे.