शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा

By admin | Updated: June 5, 2017 05:11 IST

शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे

महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांचे सद्यस्थितीचे मनुष्यबळ पाहता, रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे. अनेक वर्षांपासून पदांच्या निर्मितीसह कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे प्रवासी सुरक्षा तुटपुंज्या रेल्वे पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे.शहरात सर्वात जास्त प्रवास लोकलने केला जातो. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीस (जीआरपी) तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे हद्दीतील गुन्हा उघडकीस आणणे, गन्हेगारांचा शोध घेणे, अपघातातील मृत व्यक्तींचा पंचनामा करणे, अशी मुख्य जबाबदारी रेल्वे पोलिसांवर असते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. १९८१ ते २०१४ या कालावधीत केवळ २३९ पोलीस अधिकारी आणि ३,७८० पोलीस कर्मचारी भरती झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. २००० साली ८७ अधिकारी व ७२३ कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. २०१४ साली रेल्वे पोलीस दलात १०० पोलिसांची भरती झाली होती. मात्र त्यानंतर, अद्यापपर्यंत रेल्वे पोलीस ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.रेल्वेच्या ३ हजार लोकल फेऱ्यांमधून दररोज ७७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी सुरक्षेसह कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान काही हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी करत आहे. सीएसटी ते कर्जत, कसारा आणि चर्चगेट ते बोर्डी रोड रेल्वे स्थानकांपर्यंतचा परिसर रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येतो. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जीआरपीला अधिकारी पदांसह ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.