शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा

By admin | Updated: June 5, 2017 05:11 IST

शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे

महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांचे सद्यस्थितीचे मनुष्यबळ पाहता, रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे. अनेक वर्षांपासून पदांच्या निर्मितीसह कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे प्रवासी सुरक्षा तुटपुंज्या रेल्वे पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे.शहरात सर्वात जास्त प्रवास लोकलने केला जातो. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीस (जीआरपी) तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे हद्दीतील गुन्हा उघडकीस आणणे, गन्हेगारांचा शोध घेणे, अपघातातील मृत व्यक्तींचा पंचनामा करणे, अशी मुख्य जबाबदारी रेल्वे पोलिसांवर असते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. १९८१ ते २०१४ या कालावधीत केवळ २३९ पोलीस अधिकारी आणि ३,७८० पोलीस कर्मचारी भरती झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. २००० साली ८७ अधिकारी व ७२३ कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. २०१४ साली रेल्वे पोलीस दलात १०० पोलिसांची भरती झाली होती. मात्र त्यानंतर, अद्यापपर्यंत रेल्वे पोलीस ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.रेल्वेच्या ३ हजार लोकल फेऱ्यांमधून दररोज ७७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी सुरक्षेसह कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान काही हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी करत आहे. सीएसटी ते कर्जत, कसारा आणि चर्चगेट ते बोर्डी रोड रेल्वे स्थानकांपर्यंतचा परिसर रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येतो. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जीआरपीला अधिकारी पदांसह ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.