शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

‘बार्टी’च्या समतादूतांना नियुक्तीपत्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:38 IST

राज्यातील गावागावांत फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रचारण्यासाठी काम करणाऱ्या समतादूतांना चार महिन्यांपासून नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत.

प्रफुल्ल बाणगावकर,कारंजा लाड (जि. वाशिम)- परिवर्तनाची दिंडी खांद्यांवर घेऊन राज्यातील गावागावांत फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रचारण्यासाठी काम करणाऱ्या समतादूतांना चार महिन्यांपासून नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात साजरी होत आहे. या समतादूतांना ११ महिन्यांचा करार संपल्यानंतर नव्याने नियुक्तीपत्र देणे आवश्यक असते.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्प राबविण्यात येत आहे. जातीविरहित समता प्रस्थापित करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समतादूत नेमण्यात आले. त्यांचे रितसर प्रशिक्षणही नाशिक येथे झाले. त्यानंतर समतादूतांना २७ जुलै २०१५ ला रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. या समतादूतांनी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समताविषयक विचार, शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा व गाव बैठकीच्या माध्यमातून मांडले. तसेच त्यांच्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट याबाबतही जनजागृती करण्यात आली. मात्र २७ जून २०१६ ला समतादूतांचा ११ महिन्यांचा करार संपला. त्यानंतर बार्टीने आढावा घेतला; परंतु अद्याप समतादूतांना नियुक्तीचे आदेश दिले नाहीत.>करार संपलेल्या पूर्वीच्याच समतादूतांना पुन्हा करारावर घेण्याचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही अडचणींमुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे.- डॉ. वसंत रामटेके, मुख्य प्रकल्प संचालक, समतादूत, बार्टी