शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

‘बार्टी’च्या समतादूतांना नियुक्तीपत्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:38 IST

राज्यातील गावागावांत फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रचारण्यासाठी काम करणाऱ्या समतादूतांना चार महिन्यांपासून नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत.

प्रफुल्ल बाणगावकर,कारंजा लाड (जि. वाशिम)- परिवर्तनाची दिंडी खांद्यांवर घेऊन राज्यातील गावागावांत फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रचारण्यासाठी काम करणाऱ्या समतादूतांना चार महिन्यांपासून नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात साजरी होत आहे. या समतादूतांना ११ महिन्यांचा करार संपल्यानंतर नव्याने नियुक्तीपत्र देणे आवश्यक असते.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्प राबविण्यात येत आहे. जातीविरहित समता प्रस्थापित करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समतादूत नेमण्यात आले. त्यांचे रितसर प्रशिक्षणही नाशिक येथे झाले. त्यानंतर समतादूतांना २७ जुलै २०१५ ला रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. या समतादूतांनी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समताविषयक विचार, शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा व गाव बैठकीच्या माध्यमातून मांडले. तसेच त्यांच्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट याबाबतही जनजागृती करण्यात आली. मात्र २७ जून २०१६ ला समतादूतांचा ११ महिन्यांचा करार संपला. त्यानंतर बार्टीने आढावा घेतला; परंतु अद्याप समतादूतांना नियुक्तीचे आदेश दिले नाहीत.>करार संपलेल्या पूर्वीच्याच समतादूतांना पुन्हा करारावर घेण्याचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही अडचणींमुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे.- डॉ. वसंत रामटेके, मुख्य प्रकल्प संचालक, समतादूत, बार्टी