शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
3
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
4
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
5
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
6
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
7
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
8
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
9
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
10
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
12
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
13
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
14
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
15
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
16
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
17
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
18
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
19
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
20
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

८० टक्केदेय रकमेतील ४६५ कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: January 6, 2016 00:32 IST

दहा कारखान्यांकडून पूर्ण रक्कम : चार कारखान्यांची दमडीही नाही

राजाराम लोंढे-- कोल्हापूर विभागातील बहुतांश साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे ८० टक्केप्रमाणे ४६५ कोटी ३७ लाख रुपये देय रक्कम असून, केवळ दहा कारखान्यांनी पूर्ण पैसे दिले आहेत. चार कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्यापासून गाळपास आलेल्या उसाची एक दमडीही दिलेली नाही. साखरेच्या कोसळलेल्या दरामुळे एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना शक्य नव्हते. शेतकरी संघटना व कारखानदार आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने एफआरपीचा गुंता तयार झाला होता. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करत १५ डिसेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाचे एफआरपी पैकी ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपूर्वी देण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात १५ डिसेंबरअखेर ३८ लाख ०३ हजार टन, तर सांगली जिल्ह्यात २१ लाख ४६ हजार, असे ५९ लाख ५० हजार २१८ टन गाळप झाले आहे. याची एफआरपीप्रमाणे १४७६ कोटी ९३ लाख रुपये देय रक्कम असून, ८० टक्केप्रमाणे ११८१ कोटी ५४ लाख रुपये शेतकऱ्यांना डिसेंबरअखेर देणे बंधनकारक होते; परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील ‘बिद्री’, ‘दालमिया शुगर्स-आसुर्ले’, ‘जवाहर-हुपरी’, ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, तर सांगली जिल्ह्यातील ‘किसन अहिर-वाळवा’, ‘मोहनराव शिंदे- आरग’, ‘सद्गुरू’, उदगिरी’, ‘सद्गुरू’ या दहा कारखान्यांनीच ८० टक्केप्रमाणे १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे पैसे दिले आहेत. तर ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘महाकाली’, ‘माणगंगा’, ‘यशवंत’ या चार कारखान्यांनी गाळप सुरू झाल्यापासून एक रुपयाही शेतकऱ्यांना दिला नसल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अहवालावरून स्पष्ट होते. सरकारने आदेश देऊनही काही कारखान्यांनी कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे आता साखर आयुक्त काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.