शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्केदेय रकमेतील ४६५ कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: January 6, 2016 00:32 IST

दहा कारखान्यांकडून पूर्ण रक्कम : चार कारखान्यांची दमडीही नाही

राजाराम लोंढे-- कोल्हापूर विभागातील बहुतांश साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे ८० टक्केप्रमाणे ४६५ कोटी ३७ लाख रुपये देय रक्कम असून, केवळ दहा कारखान्यांनी पूर्ण पैसे दिले आहेत. चार कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्यापासून गाळपास आलेल्या उसाची एक दमडीही दिलेली नाही. साखरेच्या कोसळलेल्या दरामुळे एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना शक्य नव्हते. शेतकरी संघटना व कारखानदार आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने एफआरपीचा गुंता तयार झाला होता. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करत १५ डिसेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाचे एफआरपी पैकी ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपूर्वी देण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात १५ डिसेंबरअखेर ३८ लाख ०३ हजार टन, तर सांगली जिल्ह्यात २१ लाख ४६ हजार, असे ५९ लाख ५० हजार २१८ टन गाळप झाले आहे. याची एफआरपीप्रमाणे १४७६ कोटी ९३ लाख रुपये देय रक्कम असून, ८० टक्केप्रमाणे ११८१ कोटी ५४ लाख रुपये शेतकऱ्यांना डिसेंबरअखेर देणे बंधनकारक होते; परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील ‘बिद्री’, ‘दालमिया शुगर्स-आसुर्ले’, ‘जवाहर-हुपरी’, ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, तर सांगली जिल्ह्यातील ‘किसन अहिर-वाळवा’, ‘मोहनराव शिंदे- आरग’, ‘सद्गुरू’, उदगिरी’, ‘सद्गुरू’ या दहा कारखान्यांनीच ८० टक्केप्रमाणे १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे पैसे दिले आहेत. तर ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘महाकाली’, ‘माणगंगा’, ‘यशवंत’ या चार कारखान्यांनी गाळप सुरू झाल्यापासून एक रुपयाही शेतकऱ्यांना दिला नसल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अहवालावरून स्पष्ट होते. सरकारने आदेश देऊनही काही कारखान्यांनी कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे आता साखर आयुक्त काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.