शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणी पातळीबाहेरील जमिनींचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:13 IST

दूधगंगा प्रकल्प गैरव्यवहार : दहा वर्षांत प्रशासन राहिले ढिम्म

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेची मागणी : बोगस धरणग्रस्तांना पाठीशी न घालण्याचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या पाणी पातळीबाहेरील जमिनींचा तत्काळ मोबदला द्यावा, अशी मागणी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर या प्रकल्पातील संकलन रजिस्टर दुरूस्तीमधील बोगस धरणग्रस्तांना पाठीशी न घालण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पाणी पातळीबाहेरील सुमारे चारशे हेक्टर जमिनी राहिल्या आहेत. त्या मूळ मालकांना जमिनी देता येणे शक्य नसल्याचे पुनर्वसन विभागाने सांगितले आहे. जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत झाला होता; पण गेली दहा वर्षे या प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही. त्याच्या भरपाईबाबत मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाली. दूधगंगा प्रकल्पातील संकलन रजिस्टर दुरूस्तीमधील बोगस धरणग्रस्तांना पाठीशी घातले जाणार नाही. मात्र, संकलन रजिस्टर सुनावणीमध्ये ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, अशी मागणीही बैठकीत झाली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुंडोपंत पाटील, कार्याध्यक्ष शंकरराव चव्हाण, संजय पाटील, सुरेश पवार, शामराव झोरे, राम हसणेकर, विठ्ठल पाटील, गोविंद पाटील, शिवाजी जाधव, प्रकाश पाटील, प्रकाश कदम, रवींद्र पोवार, शशिकांत पाटील, अनिल माने, आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे अभिनंदन!‘दूधगंगा’ प्रकल्पातील संकलन रजिस्टर दुरूस्तीमधील बोगसगिरीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश करणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याबद्दल ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत करण्यात आला. असे झाले ठरावपात्र धरणग्रस्तांना जमिनी वाटप कराव्यातबुडीत क्षेत्राखालील कोनोली, कांबर्डे, भांडणे गावच्या घरांना मोबदला मिळावा. धरणाशी संबंध नसणाऱ्या धरणग्रस्तांवर कारवाई करावी. अतिरिक्त जमिनीचे वाटप होऊनही डोळेझाकदूधगंगा प्रकल्प गैरव्यवहार : दहा वर्षांत प्रशासन राहिले ढिम्मलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पातील दोन प्रकल्पग्रस्तांना तब्बल ४ हेक्टर ४३ आर. (म्हणजे ११ एकर) जमीन अतिरिक्त वाटप झाल्याचे पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जात लेखी दिले आहे परंतु या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमीन परत घेण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने अद्याप केली नसल्याची तक्रार एकोंडी (ता. कागल) येथील राजाराम पांडुरंग पाटील यांनी मंगळवारी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. ‘लोेकमत’ने दूधगंगा प्रकल्प जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर त्या अनुषंगाने तक्रारी सुरू झाल्या आहेत.पाटील यांनी २० फेब्रुवारी २००७ ला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यात पुनर्वसन तहसीलदारांनी असे म्हटले आहे की,‘महादेव दाजी जाधव हे काळम्मावाडीचे धरणग्रस्त (मूळ गाव बांबर्डे, ता. राधानगरी) खातेदार असून त्यांचे बुडित क्षेत्र शून्य हेक्टर ३१ आर. इतके आहे. जाधव यांना शासकीय नियमानुसार ८० आर. जमीन मिळणे आवश्यक आहे. संकलन रजिस्टरनुसार त्यांना एकोंडीमध्ये गटनंबर २०५ ‘ब’मध्ये ८० आर., २०८ ‘ब’ मध्ये ४० आर.,२६२ ‘ब’मध्ये ४० आर., २४७ ‘ब’ मध्ये ६९ आर., बामणी येथील ४५९ / १ मधील २३ आर., ३१६ / अ ६९,४५९ मधील ४१ आर. आणि ४७४ / १ मधील ४१ आर. जमीन वाटप झाली आहे. त्यांनी सरकारला फसवून अतिरिक्त ३ हेक्टर २३ आर. जमीन मिळविली असून हा कायदेशीर गुन्हा आहे.हरी लखू माने हे बांबर्डे गावचेच धरणग्रस्त आहेत. तिथे त्यांची काळम्मावाडी कार्यक्षेत्रामध्ये बुडित क्षेत्र ६७ आर. आहे. त्यांमुळे त्यांना नियमानुसार ७० आर. क्षेत्र देय आहे. हरी माने यांना एकोंडी व बामणी (ता. कागल) येथे धरणग्रस्त म्हणून १ हेक्टर ९० आर. जमीन मिळविली आहे. त्यांनी कायद्याने १ हेक्टर २० आर. जमीन अतिरिक्त मिळविली असून कायद्याने हा गुन्हा आहे, असे दि. २६ एप्रिल २००७ ला पुनर्वसन तहसीलदारांच्या सहीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे; परंतु पुढे त्यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्याने त्यांची चौकशी करून त्यांच्याकडील जमीन पुनर्वसन विभागाने काढून घ्यावी, अशी मागणी पाटील यांनी या तक्रारीत केली आहे.