शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वडवली हत्याकांड : सुबियाची आर्त हाक शेजाऱ्यांच्या कानावर गेली असती

By admin | Updated: March 9, 2016 05:47 IST

हसनैन वरेकरने बहिण बत्तुल आणि आई असगडी यांच्यावर सुऱ्याने वार केल्यानंतर तो बहिण सुबियाच्या मागे लागला. जीव वाचवण्याकरिता ती बेडरुममध्ये शिरली आणि तिने कडी लावून घेतली

जितेंद्र कालेकर, ठाणेहसनैन वरेकरने बहिण बत्तुल आणि आई असगडी यांच्यावर सुऱ्याने वार केल्यानंतर तो बहिण सुबियाच्या मागे लागला. जीव वाचवण्याकरिता ती बेडरुममध्ये शिरली आणि तिने कडी लावून घेतली. सुबियाला धमकावण्याकरिता घराचा मुख्य दरवाजा उघडून हसनैन बाहेर आला होता. त्यावेळी सुबियाची आर्त हात ऐकून आजूबाजूचे धावून आले असते व त्यांनी हसनैनला पकडले असते तर हा क्रुरकर्मा पोलिसांच्या हाती लागला असता, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मत आहे.सुबियाने खोलीचा दरवाजा उघडून बाहेर यावे याकरिता तो तिची मुलगी अल्फीयाला ठार मारण्याची धमकी देत होता. ही धमकी देताना तो काही काळ घराबाहेर आला होता. परंतु लागलीच सावध होत त्याने पुन्हा घराचा मुख्य दरवाजा बंद केला. हसनैन बाहेर असताना आजूबाजूच्या लोकांनी त्याला जेरबंद केला असता तर आपल्या कृत्यामागील कारणमिमांसा करण्याकरिता तो आज कोठडीत असता. हसनैनने प्रथम दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तो न तुटल्याने त्याने घराच्या बाहेर जाऊन सुबियाला धमकावले. घराबाहेर उभा राहून हसनैन काही काळ ओरडत होता. मात्र त्याच्याकडे लक्ष न देता सुबियाने बहिण शबिनाचा मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला. हसनैन घराबाहेर असताना पकडला गेला असता किंवा सुबियाला तो फोन सुरु करता आला असता तर कदाचित चित्र वेगळे असते, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.रात्री पावणेबारा वाजता सुबियाने पती सोजब भरमार यांना फोन केला व मुलगी सतत रडत असल्याने घ्यायला येण्याची विनंती केली होती, परंतु रात्र बरीच झालेली असल्यामुळे त्यांनी सकाळी येतो, असे सांगितले. सोजब तासभरात वरेकरांच्या घरी आले असते, तरी हसनैन हे कृत्य करायला धजावला नसता किंवा जिवंत पकडला गेला असता, असे काहींचे म्हणणे आहे.आणखी काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत..हसनैन याच्याकडे आजोबा गुलजार यांच्याकडून मिळालेले आई आणि मावशी यांच्या वाट्याचे ३० लाख रुपये होते. याखेरीज अन्य लोकांकडून त्याने कर्जाऊ पैसे घेतले होते. एकूण ७० लाखांचे कर्ज हसनैनने केले होते. एवढी मोठी रक्कम त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवली की उधळली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.> ख्वाजा गरीब नवाज कमिटीचा सदस्यहसनैन हा ख्वाजा गरीब नवाज कमिटीचा सदस्य होता. त्या कमिटीतील सभासद तैफूर, सलीम, शकफ, जमीर आणि नाजीम यांच्याशी त्याचे संबंध होते, परंतु त्याची कोणाशीही मैत्री नव्हती. संशयी वृत्तीचा असल्याने त्याच्या ओळखीचे कोणी घरी येत नसत. वर्षातून एकदा जलशाच्या निमित्ताने १० ते १५ मौलांनांना तो घरी जेवायला बोलवायचा. त्यांच्यापैकी सय्यद कौसर रब्बानी हे जबलपूरचे मौलाना दर वर्षी घरी यायचे. ते कधी-कधी मुक्कामालाही असायचे, अशी माहिती सुबियाकडून पोलिसांना मिळाली आहे.