शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जि.प.,पं.स.साठी चुरशीने मतदान

By admin | Updated: February 22, 2017 00:13 IST

कोल्हापुरात ७५ टक्के मतदान : सांगलीत ७२, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीत सरासरी ६८ टक्के मतदान

कोल्हापूर/सांगली/रत्नागिरी/सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मंगळवारी चुरशीने मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर मशीन बिघाडाच्या घटना घडल्या.कोल्हापुरात इर्ष्येने ७५ टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी अत्यंत इर्ष्येने सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर हुल्लडबाजी व त्यावरून पोलिसांनी लाठीमार केल्याच्या दोन घटना घडल्या तरी इतरत्र मात्र शांततेत ही प्रक्रिया पार पडली. दोन्ही काँग्रेस, भाजप व शिवसेना स्वतंत्र रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात ११ लाख १२ हजार इतके पुरुष आणि महिलांचे १० लाख २५ हजार इतके मतदान आहे. सांगलीत ७२ टक्के मतदानजिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७, अशा ५९० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता शांततेत सरासरी सुमारे ७२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ७०.०७ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणुकीची टक्केवारी वाढली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात सरासरी ६८ टक्के मतदानजिल्ह्यात ५५ जिल्हा परिषद गट आणि ११0 पंचायत समिती गणांसाठी सरासरी ६८ टक्के इतके मतदान झाले. संगमेश्वरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांसह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५0 जिल्हा परिषद आणि १00 पंचायत समितीच्या जागांसाठी मंगळवारी सरासरी ६८ टक्के शांततेत मतदान झाले. गत वेळच्या निवडणुकीत सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाच्या टक्केवारीत सहा टक्क्यांनी वाढ झाली. आचरा व काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली. तर काही मतदान केंद्रावर मशिन बिघाडाच्या घटना घडल्या होत्या.दोन वृद्धांचा हृदयविकाराने मृत्यूरत्नागिरी : सुकिवली (ता.खेड जि.रत्नागिरी) येथे मतदानासाठी केंद्रावर गेलेले महादेव शिवराम चाळके (वय ६४) यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. ते सुमारे तासभर रांगेत उभे होते. मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावतानाच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये असणारे (साखरोली, ता.खेड) रहिवासी संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी म्हणून मुंबईहून खेडकडे येत होते. पोलादपूर येथे बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.