शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

यादीतील घोळामुळे उमेदवारांसह मतदारही गोंधळात

By admin | Updated: January 30, 2017 19:56 IST

प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 -  प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे. शहरातील लोकसंख्या उपनगरात स्थलांतरीत झाल्यामुळे त्यानुसार प्रभागांच्या सीमा रेषा बदलण्यात आल्या आहेत. यामुळे मतदार याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. याचा परिणाम मतदानावरही होणार असल्याने उमेदवार अस्वस्थ आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ही निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक प्रभागात ५० ते ६० हजार लोकसंख्या ठेवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. परंतु वरळी येथील प्रभाग क्र. १९४ मध्ये लोकसंख्या आणि मतदारांच्या आकडेवारीत गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. ५८ हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभागात ६१ हजार ८२५ मतदार नोंदविण्यात आले आहेत. हा घोळ प्रत्यक्ष महापालिकेच्या संकेतस्थळावरच दिसून येत असल्याची तक्रार म्हात्रे यांनी केली आहे. तसेच दहिसर येथील प्रभाग क्र. १ मध्ये लोकसंख्या ४९ हजार ९४० तर मतदार अवघे २४ हजार ७९३ नोंदविण्यात आले आहेत, असा गोंधळ अन्य प्रभागांमध्येही उडाला असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम संपूर्ण मतदान प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूकच रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. असे आहेत काही घोळ मतदाराचे नाव एका प्रभागात आणि मतदानाचा अधिकार दुसऱ्या प्रभागात अशा तक्रारी प्रामुख्याने पुढे आल्या आहेत. यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी आधी आपले नाव कुठल्या मतदार यादीत आहे याचा शोध घ्यावा लागेल. - प्रभाग क्रमांक १९२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर को.आॅप. सो. 1 ते 4, बोहरी चाळ, केसरी चाळ, दूधवाला चाळ क्र. 1 व 2, खापरी देव झोपडपट्टी संघ, दळवी नगर दादर स्थानक हे ठिकाणी मतदार यादीचा गोंधळ आहे. - शीतल म्हात्रे यांचा भाऊ हार्दिक म्हात्रे हा कॅनेडियन नागरिक आहे. मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या नावाने ओळखपत्र देण्यात आले आहे. घरच्या पत्त्यावर हे ओळखपत्र पाठविण्यात आले असून त्यात आडनावाचाही घोळ आहे. त्यांचे नाव म्हात्रेऐवजी मेहता असे यादीत आले आहे. - निवडणुकीत 50 टक्क्यांहून कमी मतदान होते. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती सुरू केली आहे. यासाठी मतदान केंद्र प्रत्येक एक किमीच्या अंतरावर असणार आहे. मात्र मतदार यादीतील गोंधळामुळे मतदारांची गैरसोय होऊन त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. - 4 फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीतील चूक सुधारता येईल. अंतिम मतदार यादी 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.