शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ५२ वर्षांत मतदारांत चौपट वाढ

By admin | Updated: October 1, 2014 00:52 IST

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. १९६२ च्या निवडणुकीत विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या आतच मतदार संख्या होती.

६२ मतदार संघ : १९६२ मध्ये प्रत्येक मतदारसंघात होते लाखाच्या आत मतदार ज्ञानेश्वर मुंदे- यवतमाळ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. १९६२ च्या निवडणुकीत विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या आतच मतदार संख्या होती. मात्र आता ५२ वर्षात मतदारांच्या संख्येत चौपट वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच प्रचार तंत्रातही प्रचंड बदल झाला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर विधानसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९६२ साली झाली. यावेळी विदर्भात ६३ मतदार संघ होते. प्रत्येक मतदार संघातील मतदारांची आकडेवारी बघितली तर ती लाखाच्या आत होती. त्यावेळी सर्वाधिक मतदार १८७ क्रमांकाच्या नागपूर-१ मध्ये ९४ हजार ५७५ तर सर्वात कमी मतदार २०७ क्रमांकाच्या धानोरामध्ये ६० हजार ३५६ एवढे मतदार होते. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातही मतदारांची संख्या ७५ हजारांच्या आसपास होती. वणी मतदारसंघामध्ये ७५ हजार २००, येळाबारा ७५ हजार ६०३, केळापूर ६४ हजार ७८३, यवतमाळ ६५ हजार २१, दारव्हा ७१ हजार ५०३, दिग्रस ७३ हजार २०१, पुसदम ७१ हजार २२५ तर उमरखेड ६१ हजार ५०२ मतदार होते. यावेळी परंपरागत मतदान पद्धतीनुसार शिक्का मारावा लागत होता. त्यावेळी अवैध मतांचीही संख्या मोठी होती. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार हा ३० ते ४० हजार मते घेतली की आमदार होत होता. १९६२ च्या निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघातील विनायक माधवराव चौधरी यांनी सर्वाधिक ३७ हजार ५२३ मते मिळविली होती. त्यावेळी ६५ हजार २४० मते वैध ठरली होती. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात वसंतराव फुलसिंग नाईक यांनी ३६ हजार ९४६ मते घेतली होती. त्यावेळी ५९ हजार ९१७ मते वैध ठरली होती. काही उमेदवार तर वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन मतदारसंघातून दहा हजार २०६ मते घेऊन रामभाऊ चिकणाजी सावदे आमदार झाले होते. मात्र ५२ वर्षात मतदार संख्येत चौपट वाढ झाल्याचे दिसत आहे. उमेदवाराला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. साधारणत: ५० हजाराच्यावर मते घेणारा उमेदवारच विजयी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या विधानसभेत २० लाख पाच हजार ५८३ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार यवतमाळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख ३८ हजार ८१७ आहे. वणीत दोन लाख ६६ हजार ९७५, राळेगाव दोन लाख ६७ हजार ५३, दिग्रस दोन लाख ९२ हजार ६९३, आर्णी दोन लाख ८३ हजार ५७१, पुसद दोन लाख ७९ हजार ४९८, उमरखेड दोन लाख ७७ हजार ३६ मतदारांची संख्या आहे. अशीच संख्या विदर्भातील ६२ ही मतदारसंघाची आहे. काही मतदारसंघ तर तीन लाखांच्यावर मतदार संख्येचे आहे. मतदारांच्या संख्येत झालेल्या चौपट वाढीने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे दिव्य सर्वच उमेदवारांना करावे लागत आहे. तसेच प्रचारातही आमुलाग्र बदल झाले आहे. वाहनांची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एकंदरित वाढती मतदारसंख्या उमेदवारासाठी मात्र डोकेदुखी ठरण्याचीच अधिक शक्यता असते.