शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

विदर्भात ५२ वर्षांत मतदारांत चौपट वाढ

By admin | Updated: October 1, 2014 00:52 IST

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. १९६२ च्या निवडणुकीत विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या आतच मतदार संख्या होती.

६२ मतदार संघ : १९६२ मध्ये प्रत्येक मतदारसंघात होते लाखाच्या आत मतदार ज्ञानेश्वर मुंदे- यवतमाळ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. १९६२ च्या निवडणुकीत विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या आतच मतदार संख्या होती. मात्र आता ५२ वर्षात मतदारांच्या संख्येत चौपट वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच प्रचार तंत्रातही प्रचंड बदल झाला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर विधानसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९६२ साली झाली. यावेळी विदर्भात ६३ मतदार संघ होते. प्रत्येक मतदार संघातील मतदारांची आकडेवारी बघितली तर ती लाखाच्या आत होती. त्यावेळी सर्वाधिक मतदार १८७ क्रमांकाच्या नागपूर-१ मध्ये ९४ हजार ५७५ तर सर्वात कमी मतदार २०७ क्रमांकाच्या धानोरामध्ये ६० हजार ३५६ एवढे मतदार होते. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातही मतदारांची संख्या ७५ हजारांच्या आसपास होती. वणी मतदारसंघामध्ये ७५ हजार २००, येळाबारा ७५ हजार ६०३, केळापूर ६४ हजार ७८३, यवतमाळ ६५ हजार २१, दारव्हा ७१ हजार ५०३, दिग्रस ७३ हजार २०१, पुसदम ७१ हजार २२५ तर उमरखेड ६१ हजार ५०२ मतदार होते. यावेळी परंपरागत मतदान पद्धतीनुसार शिक्का मारावा लागत होता. त्यावेळी अवैध मतांचीही संख्या मोठी होती. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार हा ३० ते ४० हजार मते घेतली की आमदार होत होता. १९६२ च्या निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघातील विनायक माधवराव चौधरी यांनी सर्वाधिक ३७ हजार ५२३ मते मिळविली होती. त्यावेळी ६५ हजार २४० मते वैध ठरली होती. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात वसंतराव फुलसिंग नाईक यांनी ३६ हजार ९४६ मते घेतली होती. त्यावेळी ५९ हजार ९१७ मते वैध ठरली होती. काही उमेदवार तर वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन मतदारसंघातून दहा हजार २०६ मते घेऊन रामभाऊ चिकणाजी सावदे आमदार झाले होते. मात्र ५२ वर्षात मतदार संख्येत चौपट वाढ झाल्याचे दिसत आहे. उमेदवाराला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. साधारणत: ५० हजाराच्यावर मते घेणारा उमेदवारच विजयी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या विधानसभेत २० लाख पाच हजार ५८३ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार यवतमाळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख ३८ हजार ८१७ आहे. वणीत दोन लाख ६६ हजार ९७५, राळेगाव दोन लाख ६७ हजार ५३, दिग्रस दोन लाख ९२ हजार ६९३, आर्णी दोन लाख ८३ हजार ५७१, पुसद दोन लाख ७९ हजार ४९८, उमरखेड दोन लाख ७७ हजार ३६ मतदारांची संख्या आहे. अशीच संख्या विदर्भातील ६२ ही मतदारसंघाची आहे. काही मतदारसंघ तर तीन लाखांच्यावर मतदार संख्येचे आहे. मतदारांच्या संख्येत झालेल्या चौपट वाढीने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे दिव्य सर्वच उमेदवारांना करावे लागत आहे. तसेच प्रचारातही आमुलाग्र बदल झाले आहे. वाहनांची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एकंदरित वाढती मतदारसंख्या उमेदवारासाठी मात्र डोकेदुखी ठरण्याचीच अधिक शक्यता असते.