शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

असहिष्णुतेविरोधात लेखणीतून मते मांडा

By admin | Updated: November 7, 2015 02:47 IST

दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत

पुणे : दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे सुरू केले आहे. एखाद्या घटनेसंदर्भात मत कसे मांडावे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. असहिष्णुतेबाबत लेखकांनी लेखणीद्वारे मते मांडावीत. तसेच या मुद्द्यावर सरकार आणि साहित्यिकांत संवाद व्हावा, अशी अपेक्षा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सबनीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रतिभावंतांच्या हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. अशा घटना असंस्कृतपणाचे लक्षण आहे. धर्माच्या उन्मादामुळे असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्यिकांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याद्वारे पुरस्कार परत केले असले, तरी लिखाणाद्वारे कुणी मते मांडलेली नाहीत. अशा घटना देशाला नवीन नाहीत. त्यामुळे त्याचे खापर एखाद्या व्यक्तीवर फोडणे योग्य नाही; पण अशा गोष्टींचा मी निषेधच करतो. समाजातील विद्वान व्यक्ती आणि साहित्यिकांनी एकत्र येऊन संवादाचा पूल बांधल्यास देशाच्या भवितव्याला आकार देता येऊ शकेल. निधर्मी साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)शेतकरी मरतोय, दुसरीकडे पाण्याचा- धर्मवादाचा प्रश्न आहे. शेतकरी मरत असताना या मातीच्या सुपुत्राशी कुणी बेईमानी केलेली शोभू शकत नाही. सरकार, साहित्यिक, विचारवंतांची भूमिका या घटकाशी प्रामाणिक आहे का, हे शोधून बेइमानांचा पर्दाफाश करण्याचा संमेलनात प्रयत्न करीन. संमेलन संवादाचे माध्यम असावे; संघर्षाचे नाही.- श्रीपाल सबनीस, नवनिर्वाचित अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन