शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

असहिष्णुतेविरोधात लेखणीतून मते मांडा

By admin | Updated: November 7, 2015 02:47 IST

दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत

पुणे : दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे सुरू केले आहे. एखाद्या घटनेसंदर्भात मत कसे मांडावे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. असहिष्णुतेबाबत लेखकांनी लेखणीद्वारे मते मांडावीत. तसेच या मुद्द्यावर सरकार आणि साहित्यिकांत संवाद व्हावा, अशी अपेक्षा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सबनीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रतिभावंतांच्या हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. अशा घटना असंस्कृतपणाचे लक्षण आहे. धर्माच्या उन्मादामुळे असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्यिकांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याद्वारे पुरस्कार परत केले असले, तरी लिखाणाद्वारे कुणी मते मांडलेली नाहीत. अशा घटना देशाला नवीन नाहीत. त्यामुळे त्याचे खापर एखाद्या व्यक्तीवर फोडणे योग्य नाही; पण अशा गोष्टींचा मी निषेधच करतो. समाजातील विद्वान व्यक्ती आणि साहित्यिकांनी एकत्र येऊन संवादाचा पूल बांधल्यास देशाच्या भवितव्याला आकार देता येऊ शकेल. निधर्मी साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)शेतकरी मरतोय, दुसरीकडे पाण्याचा- धर्मवादाचा प्रश्न आहे. शेतकरी मरत असताना या मातीच्या सुपुत्राशी कुणी बेईमानी केलेली शोभू शकत नाही. सरकार, साहित्यिक, विचारवंतांची भूमिका या घटकाशी प्रामाणिक आहे का, हे शोधून बेइमानांचा पर्दाफाश करण्याचा संमेलनात प्रयत्न करीन. संमेलन संवादाचे माध्यम असावे; संघर्षाचे नाही.- श्रीपाल सबनीस, नवनिर्वाचित अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन