शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

असहिष्णुतेविरोधात लेखणीतून मते मांडा

By admin | Updated: November 7, 2015 02:47 IST

दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत

पुणे : दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे सुरू केले आहे. एखाद्या घटनेसंदर्भात मत कसे मांडावे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. असहिष्णुतेबाबत लेखकांनी लेखणीद्वारे मते मांडावीत. तसेच या मुद्द्यावर सरकार आणि साहित्यिकांत संवाद व्हावा, अशी अपेक्षा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सबनीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रतिभावंतांच्या हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. अशा घटना असंस्कृतपणाचे लक्षण आहे. धर्माच्या उन्मादामुळे असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्यिकांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याद्वारे पुरस्कार परत केले असले, तरी लिखाणाद्वारे कुणी मते मांडलेली नाहीत. अशा घटना देशाला नवीन नाहीत. त्यामुळे त्याचे खापर एखाद्या व्यक्तीवर फोडणे योग्य नाही; पण अशा गोष्टींचा मी निषेधच करतो. समाजातील विद्वान व्यक्ती आणि साहित्यिकांनी एकत्र येऊन संवादाचा पूल बांधल्यास देशाच्या भवितव्याला आकार देता येऊ शकेल. निधर्मी साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)शेतकरी मरतोय, दुसरीकडे पाण्याचा- धर्मवादाचा प्रश्न आहे. शेतकरी मरत असताना या मातीच्या सुपुत्राशी कुणी बेईमानी केलेली शोभू शकत नाही. सरकार, साहित्यिक, विचारवंतांची भूमिका या घटकाशी प्रामाणिक आहे का, हे शोधून बेइमानांचा पर्दाफाश करण्याचा संमेलनात प्रयत्न करीन. संमेलन संवादाचे माध्यम असावे; संघर्षाचे नाही.- श्रीपाल सबनीस, नवनिर्वाचित अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन