शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

व्हॉट्सअ‍ॅप ठरतेय संसारात अडथळा

By admin | Updated: February 16, 2015 04:19 IST

ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मागील वर्षभरात समुपदेशनासाठी आलेल्या ५०० अर्जांपैकी ४५ अर्जदार दाम्पत्यांची गाडी रुळांवर आणण्यात आली आहे

ठाणे : ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मागील वर्षभरात समुपदेशनासाठी आलेल्या ५०० अर्जांपैकी ४५ अर्जदार दाम्पत्यांची गाडी रुळांवर आणण्यात आली आहे. त्या अर्जांत ७० ते ८० टक्के अर्जदारांची पत्नी रात्री उशिरापर्यंत मोबाइल व व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याची बाब पुढे आली आहे.वेगळे राहू पाहणाऱ्या दाम्पत्यांसाठी समुपदेशनाचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली करते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ दरम्यान ५०० हून अधिक जोडप्यांनी संसार वाचविण्यासाठी या प्राधिकरणाकडे धाव घेतली़ त्यात व्हॉट्सअ‍ॅप हे मोठे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काही जोडप्यांनी तर तीन महिन्यांतच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रकरणात तर लग्नानंतर हनिमूनला जात असतानाच या जोडप्यावर सोडचिठ्ठी घेण्याची वेळ आली. ३०-३५ वर्षे संसार करणारे वृद्ध जोडपे वेगळे राहण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५०० अर्जांपैकी ४५ दाम्पत्यांचे संसार मोडण्याआधी पुन्हा सुरळीत करण्यात यश आल्याचे प्राधिकरण सदस्य वकील त्र्यंबक कोचेवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)