शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विवेकाच्या विचारांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:25 IST

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतरची ५ वर्षे; सलग ६० महिने निदर्शने, चळवळीकडे ओघ वाढला

पुणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनानंतर त्यांचे मारेकरी पकडले जावेत यासाठी अंनिसने सलग ६० महिने राज्यभर मोर्चे, निर्देशने, मॉर्निंग वॉक, सभा या माध्यमातून पाठपुरावा केला. त्याचबरोबर अंनिसच्या चळवळीचे विवेकी विचार पुढे नेण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न केले. त्यातून राज्यभरातील तरूण-तरूणींचा ओघ चळवळीकडे मोठयाप्रमाणात वाढला आहे.महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीची पहिली शाखा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ९ आॅगस्ट १९८९ रोजी पुण्यातील आपटे प्रशालेमध्ये सुरू केली. साधना मिडीया सेंटर येथे दर सोमवारी होणाऱ्या अंनिस पुणे शहर शाखेच्या साप्ताहिक बैठकीला ते नियितपणे उपस्थित रहायचे. ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी कर्वे पुलावर २० आॅगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना डॉ. दाभोलकर यांचा गोळया झाडून खून करण्यात आला. चळवळीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असलेल्या नेतृत्त्वाच्या खूनाच्या घटनेने अंनिसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. डॉ. दाभोलकर मांडत असलेल्या विचारांचा प्रसार थांबविण्याच्या हेतूने त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. दाभोलकरांचे मारेकरी व त्यापाठीमागचे मास्टरमार्इंड जोपर्यंत पकडले जात नाहीत तोपर्यंत महाराष्टÑातील व देशातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवाला असलेला धोका कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या मारेकºयांना पकडण्यासाठी गेली ५ वर्षे अंनिसकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दरम्यानच्या काळात कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खून झाले. त्यामुळे दाभोलकर यांच्या खूनानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरली. त्यामुळे या सर्वांचे मारेकरी पकडले जावेत यासाठी राज्यभर सातत्याने निर्दशने करण्यात आली.पुण्यातील महर्षी कर्वे पुलावर प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला निर्देशने करण्यात आली. इतर शहरांमध्ये जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जात होते, काही ठिकाणी मॉर्निंग वॉक काढून मारेकºयांना पकडण्याची मागणी करण्यात आली. नाशिकमध्ये व्याख्यानमाला भरवून याबाबत प्रबोधन करण्यात आले.अंनिसच्या माध्यमातून डॉ. दाभोलकर असे काय विचार मांडत होते म्हणून त्यांचा खून करण्यात आला हे समजून घेण्यासाठी तरूण-तरूणींचा ओघ मोठयाप्रमाणात चळवळीकडे आला. सध्या राज्यभरातील अंनिसच्या शाखांची संख्या ३५० च्या पुढे गेली आहे. बाबा बुवांचा पर्दाफाश, शोषण करणाºया अंधश्रध्दांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, व्याख्यान, चमत्कारांचे सादरीकरण यातून प्रबोधन आदी उपक्रमांमधून चळवळीचे काम सातत्याने पुढे नेले जात आहे.‘तसे’ काहीही घडताच पहिला फोन अंनिस कार्यकर्त्यांनाअंधश्रध्देच्या नावाखाली बाबा बुवांकडून फसवणूक केली जात असल्यास, करणी-भानामती सारखी तक्रार असल्यास, त्याचबरोबर इतर कुठल्याही प्रकारे अंधश्रध्दा पसरविण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याविरोधात लगेच अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे लोक धाव घेऊ लागले आहेत.जादूटोणा विरोधी कायद्याच्या मदतीने असे प्रकार थांबविण्याचा पूर्ण प्रयत्न अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. त्याचबरोबर जटनिर्मुलन, चमत्कारांचे सादरीकरण, व्याख्यान, चर्चासत्र यामाध्यमातूनही प्रबोधनाचे काम कार्यकर्ते करीत आहेत.जादूटोणाविरोधी कायद्यामुळे लढयाला मोठे बळजादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह अंनिसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सलग १८ वर्षे लढा दिला. डॉ. दाभोलकरांच्या खूनानंतर मात्र खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने अध्यादेश काढून जादूटोणा विरोधी कायदा तातडीने लागू केला.या कायद्यान्वये राज्यात ४०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा मंजूर करण्याची मागणी करताना याबाबत अनेक गैरसमज पसरविले जात होते. मात्र त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हे सर्व गैरसमज खोटे असल्याचे आपोआप स्पष्ट झाले. या कायद्यामुळे अंधश्रध्दा विरोधातील लढयाला मोठे बळ मिळाले आहे.पर्यावरणपूरक उपक्रमांना मोठी चालनागणेश मुर्तींचे नदी, तलाव, विहीरींमध्ये विसर्जन केल्याने पाण्याचे स्त्रोत मोठयाप्रमाणात प्रदूषित होत असल्याने कृत्रिम हौदात, घरच्या घरी विसर्जन करण्याचे आवाहन १९९५ मध्ये अंनिसच्यावतीने करण्यात आले. याला गेल्या काही वर्षांमध्ये राज्यभर खूपच चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.अगदी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनीही कृत्रिम हौदात विसर्जन करून चळवळीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे फटाकेमुक्त दिवाळी या उपक्रमामुळे दिवाळीत फटाके उडविण्याचे प्रमाण लक्षणियरित्या घटत असल्याचे दिसून येते.इतर राज्यातही अंनिसच्या विचारांचा प्रसारमहाराष्टÑा पाठोपाठ कर्नाटक राज्यातही जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला आहे. त्यासाठी कर्नाटकचे तत्कालीन कायदामंत्री जयचंद्रन यांनी अंनिसच्या पदाधिकाºयांची भेट घेऊन या कायद्याची सखोल माहिती घेतली होती. त्याचबरोबर आता केंद्रानेच हा कायदा करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशात ठिकठिकाणी विवेकवादी संघटनांकडून डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतीदिन २० आॅगस्ट हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दाभोलकरांची पुस्तके, भाषणे यांचे इतर अनेक भाषांमध्ये भाषांतर केले जात आहे.- मिलिंद देशमुख, राज्य प्रधान सचिव, अंनिस

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून