शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठू माऊली तू..

By admin | Updated: July 8, 2014 23:27 IST

पुणो-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 जवळ पुरंदर, हवेली, दौंड या तालुक्यांच्या सीमेवर डाळिंब या गावी अंदाजे 400 वर्षापूर्वीचे पुरातन विठ्ठल मंदिर आहे.

 उरुळी कांचन : पुण्यापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर पुणो-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 जवळ पुरंदर, हवेली, दौंड या तालुक्यांच्या सीमेवर डाळिंब या गावी अंदाजे 400 वर्षापूर्वीचे पुरातन विठ्ठल मंदिर आहे. या ठिकाणी श्री विठ्ठलाची स्वयंभू शिळा आहे. जागृत स्वयंभू शिळा ठिकाण तसेच ठेवून पंढरपूरच्या हुबेहूब विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी साकारली आहे. या मंदिराच्या पश्चिम बाजूला शंकराचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाला व दोन नंदी असल्याने या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. श्री विठ्ठल मंदिरासमोर पुरातन एक लिंबाचे व दोन चिंचेची खूप जुनी झाडे आहेत.  दक्षिणोस विहीर व पाझर तलाव आहे. 

 
पूव्रेस वाहणारा ओढा व चारही बाजूंना 35 एकरांमध्ये विविध प्रकारच्या झाडाझुडपांचे, वृक्षांचे वन आहे. लोकवस्तीपासून दूर एक किलोमीटर अंतरावर झाडीमध्ये श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. म्हणून या ठिकाणाला बनातील विठोबा, असे संबोधले जाते. पुरातन काळापासून श्री चांगावटेश्वराची पालखी सासवड येथून पंढरपूरला जाताना या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी थांबते. वर्षभरातील सर्व सण या ठिकाणी मोठय़ा उत्साही वातावरण साजरे केले जातात. आषाढी एकादशी यात्रेस या ठिकाणी लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पुरातन काळातील हे ठिकाण जागृत देवस्थान असून, पंचक्रोशीतील प्रति-पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे.
अशा निसर्गरम्य पुरातन श्री विठ्ठल मंदिराचा विश्वस्त कमिटीच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आला असून, जुने मंदिर तसेच ठेवून, जुने शिखर काढून नवीन शिखर बनवून त्यामध्ये 51 विविध देवतांच्या मूर्ती बनवल्या आहेत. 
पूर्वी दहा भाविक बसायचे त्या ठिकाणी एक हजार भाविक बसतील, अशा भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, भाविकांसाठी भक्तनिवास, शौचालय या सोयी करण्यात आल्या आहेत. 
लग्न सोहळ्यासाठी देवस्थानमार्फत मंडप उभा करण्यात आला असून, सर्वसामान्यांसाठी माफक दरात लग्न लावण्यात येते. वर्षभरात जवळपास 1क्क् लग्ने लावली जातात. तसेच सामूहिक लग्ने सोहळे पार पडतात. (वार्ताहर)
 
4या श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पुणो-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील उरुळी कांचन या ठिकाणी पीएमटी, एसटी बस व रेल्वे थांबतात. पुणो- स्वारगेट येथून पीएमटी बसने व पुणो रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने उरुळी कांचन येथे येता येते व तेथून दक्षिणोस पाच किलोमीटर अंतर खासगी वाहनाने मंदिरार्पयत जाता येते. तसेच, सातारा-भोर-नारायणपूर-सासवड मार्गाने व लोणंद-मोरगाव-जेजुरी येथून वाघापूर चौफुला-श्ंिांदवणो घाटमार्गे शिंदवणो व तेथून दोन किलोमीटर अंतरावर प्रति-पंढरपूर डाळिंब तीर्थक्षेत्रच्या ठिकाणी येता येते.
4विठ्ठल मंदिराचा विकास चांगल्या प्रकारे करून भाविकांसाठी चांगल्या प्रकारच्या सोयी करण्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा करून करण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळ करत आहे.
4प्रति-पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीविठ्ठल देवस्थान हे पुण्यापासून अवघ्या 35 कि लोमीटरवर व उरुळी कांचनपासून दक्षिणोकडे 5 कि लोमीटर अंतरावर दौंड, हवेली व पुरंदर या तीन तालुक्यांच्या सीमेवर डाळिंब या गावी असून, पंचक्रोशीतील ते श्रद्धास्थान आहे.
 
4पुरातन काळातील विठ्ठल मंदिर हे अंदाजे 4क्क् वर्षापूर्वीचे असून, पूर्वी सर्व बाजूंना काटेरी बाभळीचे बन या ठिकाणी होते, म्हणून या क्षेत्रला ‘बनातील विठोबा’ म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी विठ्ठलाची स्वयंभू (तांदळा) मूर्ती असून, मंदिराशेजारी एक जुने लिंबाचे झाड व दोन चिंचेची झाडे आहेत. तसेच, त्या काळातील एक बारव आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार
4प्रत्येक आषाढी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्र भरते. श्रवण महिन्यात मोठय़ा प्रमाणावर सत्यनारायणाच्या महापूजा होत असतात. तसेच, चैत्र महिन्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. 14 जून 1994 रोजी श्री विठ्ठल देवस्थानला ट्रस्ट म्हणून मान्यता मिळाली.आषाढी एकादशी सन 1994 रोजी तो सोन्याचा दिवस उगवला. दत्ताेबा अण्णा कांचन, तत्कालीन आमदार सुभाष अण्णा कुल, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन समारंभ मोठय़ा थाटामाटात झाला. गावक:यांचा आनंद ओसंडून वाहत होता. भराभर देणगी जमा होऊ लागली. सभामंडपाचे काम पूर्ण झाले. 
 
देवस्थानमुळे डाळिंबचा कायापालट
4आमदार फंडातून व खासदार फंडातून उरुळी कांचन ते विठ्ठल देवस्थान हा रस्ता डांबरीकरण झाला. खासदार फंडातून शाळेसाठी चार खोल्या बांधण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. तसेच, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 4क् लाख रुपयांचा दत्तवाडी ते डाळिंब गाव हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. अशा प्रकारे देवस्थानचा आणि देवस्थानच्या माध्यमातून गावाचा विकास झाला. देवस्थानमुळे डाळिंबचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर चमकू लागले. डाळिंबच्या दृष्टीने सोन्याचा दिवस श्री विठ्ठल मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुमारे 35 लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले.