शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

राष्ट्रसंतांचा संदेश जागविण्यासाठी भारतभ्रमण

By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST

‘माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला..’ अशी हाक आपल्या भजनातून देऊन तुकडोजी महाराजांनी माणसं शोधण्याचा आणि जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंतांचा हा संदेश देशभरात पोहोचविण्यासाठी

भंडारा :  ‘माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला..’ अशी हाक आपल्या भजनातून देऊन तुकडोजी महाराजांनी माणसं शोधण्याचा  आणि जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंतांचा हा संदेश देशभरात पोहोचविण्यासाठी आंधळगावचा ४२ वर्षीय ‘तरुण’ माणसा-माणसातील हरविलेलं  माणूसपण शोधण्यासाठी शनिवारी दुचाकीने भारतभ्रमणावर निघाला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांंपूर्वीही त्यांनी दुचाकीने भारतभ्रमण केले होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेल्या माणसाला शोधण्यासाठी किरण सातपुते यांनी दुचाकीने भारतभ्रमण  करण्याचा निर्धार केला आहे. समाजातून संपत असलेली परस्परांप्रतीची सहिष्णुता, सद्भावना वाढीस लागावी, हा या प्रवासाचा उद्देश असल्याचे  त्यांनी सांगितले. या प्रवासाचा खर्च कसा करणार? या प्रश्नावर त्यांनी ‘तुकडोजी महाराज, गाडगेबाबांकडे बँक बॅलन्स होता का? असे अंतर्मुख  करणारे उत्तर दिले. दररोज २00 कि.मी. चा प्रवास केल्यानंतर रात्र झाली की त्याच गावातील एखाद्या मंदिरात मुक्काम करायचा. तत्पूर्वी मंदिर परिसराची स्वच्छता  करायची. रात्री कीर्तनातून राष्ट्रसंतांचा संदेश जागवायचा आणि  झोपण्यापूर्वी त्याच गावात हात जोडून पोटापुरते अन्न  मागायचे. दुसर्‍या दिवशी  पुढच्या प्रवासाला निघायचे, असा दिनक्रम आखला असल्याचे त्यांनी सांगितले. ६ जून २0११ रोजी भारतभ्रमणाची तयारी केली. दुचाकीने दिल्ली गाठली. त्यावेळी एक सहकारी सोबत होता. त्याच्या निरुत्साहामुळे माघारी फिरावे  लागले. त्याचदिवशी पुन्हा संकल्प केला. त्यानंतर ६ जून २0१२ रोजी भारतभ्रमण करुन परतलो. मागीलवर्षी रेल्वने अमरनाथला गेलो होतो. तिथे   भगवान शंकराचे अस्त्र ‘त्रिशूल’ दिसले नाही. त्याचवेळी संकल्प केला. दुचाकीने अमरनाथला जायचे. तिथे पितळी ‘त्रिशूल’ अर्पण करायचे ठरविले.  हे त्रिशूल नागपूर येथून आणले असून त्यासाठी २१ हजार रुपयांचा खर्च आला. आता सोबत त्रिशूल घेऊन जात आहे. कुटुंबात आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आहे. गावात स्वत:चे घर असून मंडप डेकोरेशनचा छोटासा व्यवसाय आहे. आपल्या संदेश यात्रेला  कुटुंबांची सहमती असल्यामुळेच मार्ग सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले. आपला प्रवास हा सद्भावनेचा संदेश आहे. त्यामुळे  प्रत्येक गावात लोकांशी  गप्पा करणार आहे. आपल्याला मंदिरातील गाभार्‍यात नव्हे! तर माणसात देव शोधायचा आहे, असे सांगून या भारतभेटीत राष्ट्रसंतांना अपेक्षित  असलेला माणूस भेटेल, असा विश्‍वास  त्यांनी व्यक्त केला.  (जिल्हा प्रतिनिधी)