शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

‘व्हिजन डोंबिवली’ थंड बस्त्यात

By admin | Updated: January 19, 2017 03:52 IST

स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी शहरातील जाणकारांनी पुढाकार घेऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम हाती घेतला.

मुरलीधर भवार,

डोंबिवली- स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी शहरातील जाणकारांनी पुढाकार घेऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहा महिन्यांपूर्वी भेट घेतली. त्याच्या सूचनेनुसार हा २१ कलमी आराखडा त्यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेस सादर केला. पण कोणीही त्याला प्रतिसादही दिलेला नाही. त्यामुळे स्मार्ट शहर करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना शहर स्वच्छ-सुदंर करण्यात स्वारस्य उरले नसल्याची टीका या ‘व्हिजन’साठी पुढाकार घेणाऱ्यांनी केली.या आराखड्यावर ना मुख्यमंत्री कार्यालयाने काही प्रतिसाद दिला, ना पालिकेने. त्यामुळे पालिकेला वगळून ‘व्हिजन डोंबिवली’चे प्रयत्न सध्या सुरू आहेत.डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी पुढाकार घेतला आणि त्या उपक्रमाला ‘व्हिजन डोंबिवली’ हे नाव दिले. या उपक्रमाचा शुभारंभ त्यांनी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये केला आणि २१ कलमी कार्यक्रम हाती घेतला आणि जूनमध्ये मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी हे व्हिजन समजून घेत त्याचा आराखडा मुख्यमंत्री कार्यलय आणि महापालिकेला सादर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यावर बैठक घेण्याचे आश्वासन कोल्हटकर यांना दिले. त्याला सहा महिने उलटून गेले, तरी त्यावर अद्याप बैठक घेण्यास मुख्यमंत्र्यांनाही वेळ मिळालेला नाही. कोल्हटकर यांनी महापालिका व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आराखड्यावर काहीही काम अद्याप सुरु झालेले नाही. महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसला तरी कोल्हटकर यांनी त्यांचा उपक्रम पुढे सुरुच ठेवला आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी आजवर चार शिबीरे घेतली. त्यातून त्यांच्याकडे एक हजार किलो ई कचरा जमा झाला. तो त्यांनी एका कंपनीकडे प्रक्रियेसाठी सूपूर्द केला. ई-कचरा गोळा करण्याचे स्टेशन सुरु करण्यासाठी ‘व्हिजन डोंबिवली’ उपक्रमांतर्गत पालिका प्रशासनाकडे त्यांनी डोंबिवलीत जागा मागितली. पण पालिकेने ती देऊ केलेली नाही. प्लास्टिक मनी व कॅशलेशची संकल्पना अंमलात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोत्साहन देत असले, तरी कॅशलेशमुळे ईलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर वाढणार आहे. भारतात ई कचऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढीस लागले आहे. मोबाईलचा वापर वाढतो आहे. त्यातून ई-कचरा वाढतो आहे. त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे गरजेचे आहे, याकडे कोल्हटकर यांनी लक्ष वेधले. >पालिकेची अनास्थामहापालिकेने घनकचरा प्रकल्प न उभारल्याचा याचिका राष्ट्रीय हरीत लवादाकडे आहे. ई-कचरा प्रक्रिया व प्लास्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर केला, तर घनकचरा कमी होण्यास मदत मिळू शकते. परंतु त्याबाबतही पालिकेत असलेल्या अनास्थेबद्दल कोल्हटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.>प्लास्टिक प्रक्रियेवर देणार भर २१ कलमी कार्यक्रमात त्यांनी ई-कचऱ्याला प्राधान्य दिले. त्याचबरोबर प्लास्टिकमुक्त शहरासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला आळा कसा घालता येईल, यासाठी शाळांमधून जनजागृती सुरु आहे. या प्रकल्पातून नफा मिळविण्याचा उद्देश नसूनही पालिकेचा प्रतिसाद शून्य आहे. पालिकेनेही प्लास्टिकविरोधी मोहीम सुरु केली आहे. तिला ‘व्हिजन डोंबिवली’ची जोड दिल्यास ती अधिक गतीमान व प्रभावी होऊ शकते, अशी आपेक्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली. प्लास्टिकचा पुनर्वापर करुन त्यापासून डिझेल निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. त्याला नवी मुंबईच्या कंपनीने प्रतिसाद दिला आहे.