शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

‘व्हिजन डोंबिवली’ थंड बस्त्यात

By admin | Updated: January 19, 2017 03:52 IST

स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी शहरातील जाणकारांनी पुढाकार घेऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम हाती घेतला.

मुरलीधर भवार,

डोंबिवली- स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी शहरातील जाणकारांनी पुढाकार घेऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहा महिन्यांपूर्वी भेट घेतली. त्याच्या सूचनेनुसार हा २१ कलमी आराखडा त्यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेस सादर केला. पण कोणीही त्याला प्रतिसादही दिलेला नाही. त्यामुळे स्मार्ट शहर करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना शहर स्वच्छ-सुदंर करण्यात स्वारस्य उरले नसल्याची टीका या ‘व्हिजन’साठी पुढाकार घेणाऱ्यांनी केली.या आराखड्यावर ना मुख्यमंत्री कार्यालयाने काही प्रतिसाद दिला, ना पालिकेने. त्यामुळे पालिकेला वगळून ‘व्हिजन डोंबिवली’चे प्रयत्न सध्या सुरू आहेत.डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी पुढाकार घेतला आणि त्या उपक्रमाला ‘व्हिजन डोंबिवली’ हे नाव दिले. या उपक्रमाचा शुभारंभ त्यांनी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये केला आणि २१ कलमी कार्यक्रम हाती घेतला आणि जूनमध्ये मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी हे व्हिजन समजून घेत त्याचा आराखडा मुख्यमंत्री कार्यलय आणि महापालिकेला सादर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यावर बैठक घेण्याचे आश्वासन कोल्हटकर यांना दिले. त्याला सहा महिने उलटून गेले, तरी त्यावर अद्याप बैठक घेण्यास मुख्यमंत्र्यांनाही वेळ मिळालेला नाही. कोल्हटकर यांनी महापालिका व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आराखड्यावर काहीही काम अद्याप सुरु झालेले नाही. महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसला तरी कोल्हटकर यांनी त्यांचा उपक्रम पुढे सुरुच ठेवला आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी आजवर चार शिबीरे घेतली. त्यातून त्यांच्याकडे एक हजार किलो ई कचरा जमा झाला. तो त्यांनी एका कंपनीकडे प्रक्रियेसाठी सूपूर्द केला. ई-कचरा गोळा करण्याचे स्टेशन सुरु करण्यासाठी ‘व्हिजन डोंबिवली’ उपक्रमांतर्गत पालिका प्रशासनाकडे त्यांनी डोंबिवलीत जागा मागितली. पण पालिकेने ती देऊ केलेली नाही. प्लास्टिक मनी व कॅशलेशची संकल्पना अंमलात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोत्साहन देत असले, तरी कॅशलेशमुळे ईलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर वाढणार आहे. भारतात ई कचऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढीस लागले आहे. मोबाईलचा वापर वाढतो आहे. त्यातून ई-कचरा वाढतो आहे. त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे गरजेचे आहे, याकडे कोल्हटकर यांनी लक्ष वेधले. >पालिकेची अनास्थामहापालिकेने घनकचरा प्रकल्प न उभारल्याचा याचिका राष्ट्रीय हरीत लवादाकडे आहे. ई-कचरा प्रक्रिया व प्लास्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर केला, तर घनकचरा कमी होण्यास मदत मिळू शकते. परंतु त्याबाबतही पालिकेत असलेल्या अनास्थेबद्दल कोल्हटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.>प्लास्टिक प्रक्रियेवर देणार भर २१ कलमी कार्यक्रमात त्यांनी ई-कचऱ्याला प्राधान्य दिले. त्याचबरोबर प्लास्टिकमुक्त शहरासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला आळा कसा घालता येईल, यासाठी शाळांमधून जनजागृती सुरु आहे. या प्रकल्पातून नफा मिळविण्याचा उद्देश नसूनही पालिकेचा प्रतिसाद शून्य आहे. पालिकेनेही प्लास्टिकविरोधी मोहीम सुरु केली आहे. तिला ‘व्हिजन डोंबिवली’ची जोड दिल्यास ती अधिक गतीमान व प्रभावी होऊ शकते, अशी आपेक्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली. प्लास्टिकचा पुनर्वापर करुन त्यापासून डिझेल निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. त्याला नवी मुंबईच्या कंपनीने प्रतिसाद दिला आहे.