शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र तावडेच सूत्रधार

By admin | Updated: September 8, 2016 06:25 IST

हिंदू जनजागृती समितीचा सदस्य आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार असून

पुणे : हिंदू जनजागृती समितीचा सदस्य आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार असून त्यानेच विनय पवार, सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने दाभोलकरांची हत्या केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुणे येथील न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे़ सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस़ आऱ सिंह यांनी बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे-पाटील यांच्या न्यायालयात वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़ तावडेवर भारतीय दंड विधानच्या कलम १२० (ब) (गुन्हेगारी कट) व ३०२ (खून) तसेच इतर आरोप ठेवण्यात आले आहेत, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नसल्यामुळे राज्यात मोर्चे, निदर्शनांचे सत्र सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर आले आहेत, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नसल्यामुळे राज्यात मोर्चे, निदर्शनांचे सत्र सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मे २०१४ मध्ये दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयने गेल्या जून महिन्यात तावडेला अटक केली होती. दाभोलकर यांच्या हत्येत तावडेसह सारंग अकोलकर याचाही हात असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. २००९ च्या गोवा बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विनंतीवरून इंटरपोलने जुलै २०१२ मध्ये अकोलकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. अकोलकरही सनातन संस्थेचा कथित कार्यकर्ता आहे. सीबीआयने १ जून रोजी तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता़ तसेच अकोलकर याच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता़ त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीवरुन सीबीआयने १० जून २०१६ ला तावडे याला अटक केली होती़ तो सध्या कॉ़ गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे़ (प्रतिनिधी)तपासात पुढे काय?1दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्व्हरचा बॅलेस्टिक अहवाल परदेशातून मागविला असून तो आल्यानंतर या गुन्ह्याचे आणखी धागेदोरे उकलण्याची शक्यता आहे़ 2फरार आरोपी व तावडे याच्या मोटारसायकलीचा तपास देखील करायचा आहे. डॉ.दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक केली होती़ ते सध्या जामिनावर आहेत, असे आरोपपत्रात म्हटले आहे़ काय म्हटले आहे २४ पानी आरोपपत्राततपासात निष्पन्न बाबींचा गोषवारा.कट रचणे आणि हत्या करणे असे आरोप वीरेंद्र तावडेवर ठेवले. डॉ़ दाभोलकर हे रुढी, परंपरा यांच्याविरुद्ध मोहीम चालवितात़ अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात़ संत, देवाबद्दल अनुचित उद्गार काढतात़, चमत्काराला आव्हान देतात म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली. दाभोलकर यांची हत्या झाली त्यावेळी त्या परिसरात साफसफाईचे काम करणारे ६ साक्षीदार तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला होता. काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन दोघे जण जाताना पाहिले होते.वीरेंद्रसिंह तावडे याने मुंबईतून एमबीबीएस केले. २००१ पर्यंत कोल्हापूर येथे तो प्रॅक्टिस करीत होता़ सनातन संस्थेचे प्रमुख डॉ़ जयंत आठवले यांच्या भाषणाने प्रभावीत होऊन १९९८ मध्ये तो सनातनच्या संपर्कात आला़ कोल्हापूरात त्याने भाषणे देणे सुरु केले. 2003ला तो सनातनचा समन्वयक म्हणून काम पाहू लागला़ हिंदू जनजागृती समितीशी त्याचा संपर्क झाला़ अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाबाबत डॉ़ दाभोलकरांची कोल्हापूरची बैठक त्याने इतरांच्या मदतीने उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता़ शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्याविरोधात २००४ मध्ये कॉ़ पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात मोर्चा निघाला होता़ त्याला विरोध करण्यास तावडने मोर्चा काढला होता़ नवरात्रीच्या दरम्यान कोल्हापूर ख्रिश्चन फादर विजय फिली यांनी हिंदू महिलेचे धर्मपरिवर्तन केले होते़ या महिलेला पंचगंगेवर नेऊन तिला प्रार्थना करायला सांगितली होती़ तावडेने तेथे जाऊन विरोध केला होता़ २००६ पर्यंत तावडे हा वेगवेगळ्या मार्गाने कारवाई करीत होता़ आरोपपत्रात विनय पवार, सारंग अकोलकर या दोघांवर सबळ पुराव्यांसह आरोप ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने अटक होण्याची आवश्यकता आहे.