शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर ३० रोजी निकाल; पानसरे हत्येप्रकरणी सरकारचा युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:54 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्येचा कट सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यानेच रचला आहे. त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्येचा कट सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यानेच रचला आहे. त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.शनिवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात तावडेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.गेले दोन दिवस ही सुनावणी होती. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून ३० जानेवारीला निकाल देण्यात येईल, असे बिले यांनी स्पष्ट केले.संशयित तावडेविरोधात नोंदविलेले साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब एस.आय.टी.कडे आहेत आणि नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने तावडेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तावडेला पानसरे हत्या प्रकरणात जामीन देऊ नये, अशी विनंती अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी या वेळी केली.एखाद्या व्यक्तीला आरोपी करायचे आणि त्याच्याविरोधात खोटे पुरावे गोळा करून त्याला आरोपीच्या पिंजºयात उभे करायचे, तसे तपास यंत्रणेने तावडे याच्याबाबतीत केले आहे.त्याला या प्रकरणात जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे, असा युक्तिवाद तावडेचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केला.निंबाळकर-पटवर्धन यांच्यात शाब्दिक चकमकदाभोलकर, पानसरे व एम.एम. कलबुर्गी हत्या प्रकरणांमध्ये साम्य आहे, असा मुद्दा सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर हे युक्तिवादावेळी मांडत होते. याला आक्षेप घेत पानसरे हत्या प्रकरणात कलबुर्गी हत्येचा संबंध आणू नका, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. यावरून निंबाळकर व पटवर्धन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावर ‘सुनावणी सुरू ठेवायची की पुढील तारीख देऊ?’ असे न्यायाधीशांनी दोघांनाही सुनावले.

टॅग्स :Courtन्यायालय