शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विपिन इटणकर राज्यात पहिला

By admin | Updated: June 13, 2014 02:30 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला.

मुंबई/पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या गौरव अग्रवाल याने प्रथम स्थान पटकाविले, तर नागपूरच्या विपिन इटणकर याने राज्यातून अव्वल स्थान पटकविले आहे. त्याने देशाच्या यादीत १४वा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील सुमारे ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांची या परीक्षेत निवड झाली आहे.आयोगाने डिसेंबर २0१३मध्ये मुख्य परीक्षा घेतली होती; तर मे आणि जून महिन्यात मुलाखती झाल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून १ हजार १२२ उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये ५१७ खुल्या गटातील, ३२६ ओबीसी, १८७ एससी आणि ९२ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. यशस्वी उमेदवारांमध्ये १५ अपंग उमेदवारांचाही समावेश आहे. आयोगाने या उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि ब या पदांवर नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.देशात जयपूरच्या गौरव अग्रवाल याने प्रथम क्रमांक पटकावला आहे; तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीच्या मुनीश शर्मा आणि रचित राज यांनी स्थान पटकविले आहे. उत्तीर्णांच्या यादीत पहिल्या १०मध्ये तीन मुलींनी बाजी मारली आहे. गेली सलग चार वर्षे या परीक्षेत मुलीने पहिला गुणवत्ता क्रमांक मिळविला होता. दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी होताना गौरव अगरवालने ही परंपरा खंडित केली आहे. राज्यातून सुमारे दीडशे उमेदवार अंतिम परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी सुमारे ऐंशी ते नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले असून, पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील ४ उमेदवारांचा समावेश झाला आहे. प्रथमच नव्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यंदा यूपीएससी परीक्षेला राज्यातून सुमारे साडेतीन लाख उमेदवार बसले होते. त्यामधून मुख्य परीक्षेसाठी साधारण १७ हजार उमेदवारांची आणि मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी ३ हजार उमेदवार निवडले होते. यामधून १,१२२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उत्तीर्ण उमेदवारांमधून आयएएस १८0, आयएफएस ३२, आयपीएस १५0, केंद्रीय सेवा गट अ ७१0, गट ब १५६ या पदांवर नेमणूक होणार आहे. सध्या या चार प्रकारच्या सेवांमध्ये मिळून १,२२८ रिक्त पदे नियुक्तीसाठी उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने आयोगास कळविले आहे. म्हणजेच निवड झालेल्या सर्वांना नियुक्त्या मिळू शकतील. (प्रतिनिधी)