शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

लाचखोर माळींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’!

By admin | Updated: June 11, 2014 01:41 IST

मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक

सुमेध वाघमारे - नागपूर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. मात्र त्याचवेळी धडधाकट असलेल्या आरोपींना वातानुकूलित अतिदक्षता विभागात ठेवून अगदी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जाते. हा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला. लाच घेताना अटक केलेल्या अरुण माळी यांच्यावर विशेष उपचार सोमवारच्या रात्रीपासून सुरू आहे. औषध वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचा अंतर्गत वॉर्ड क्र. २४ हा अतिदक्षता विभाग येतो. २४ खाटांच्या या विभागात सुमारे १८ रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते तर विशेष सहा रुग्णांना वातानुकूलित विभागात ठेवले जाते. अतिदक्षता विभागात सर्जरी व इतरही विभागाच्या गंभीर रुग्णांनाही ठेवले जाते. यामुळे मेडिकलमधील हा विभाग सर्वात व्यस्त आहे. अनेक वेळा या विभागात गंभीर रुग्णांनाही खाट मिळत नाही.माळी आजारी आहेत ?सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना रविवारी अडीच लाख रु पयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली. सोमवारी त्याला पोलीस कोठडी मिळाली. रात्री ११.३० वाजता छातीत दुखते आणि घबराहट होते म्हणून त्याला याच विभागात आणले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रात्रीच एका हृदयतज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला तपासले. ईसीजी काढला. परंतु त्यात हृदयाशी संबंधित बदल दिसले नाही. तसा अहवालही दिला. सामान्यत: त्याचवेळी लगेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या संबंधित डॉक्टरने त्याला पोलिसांच्या हवाली किंवा सामान्य वॉर्डात हलवायला हवे होते. परंतु त्याला वातानुकूलित असलेल्या अतिदक्षता विभागातच ठवले. आज सकाळपासून माळी आपल्या मोबाईलमध्ये गाणी ऐकत होते, गेम खेळत होते, मोबाईलवरून दुसऱ्याशी संवाद साधत होता. याची कोणीच दखलही घेतली नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे त्याला ना सलाईन लावलेले होते ना इतर कुठले औषध. तरीही आज सकाळपासून त्याला काय पाहिजे-नको त्याची गंभीरपणे खबरबात घेणे सुरू होते. मात्र त्याचवेळी भरती असलेल्या इतर रुग्णांकडे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येत होते. त्या सामान्य रुग्णांना विविध मशीन लावून आपली जबाबदारी संपली असे वागताना काही डॉक्टर दिसून येत होते. त्यांची शुश्रुषा करण्यासाठी त्यांचे नातेवाईकच धावपळ करीत होते. ही माणुसकीची शोकांतिका आहे, असे येथील रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)