शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर माळींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’!

By admin | Updated: June 11, 2014 01:41 IST

मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक

सुमेध वाघमारे - नागपूर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. मात्र त्याचवेळी धडधाकट असलेल्या आरोपींना वातानुकूलित अतिदक्षता विभागात ठेवून अगदी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जाते. हा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला. लाच घेताना अटक केलेल्या अरुण माळी यांच्यावर विशेष उपचार सोमवारच्या रात्रीपासून सुरू आहे. औषध वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचा अंतर्गत वॉर्ड क्र. २४ हा अतिदक्षता विभाग येतो. २४ खाटांच्या या विभागात सुमारे १८ रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते तर विशेष सहा रुग्णांना वातानुकूलित विभागात ठेवले जाते. अतिदक्षता विभागात सर्जरी व इतरही विभागाच्या गंभीर रुग्णांनाही ठेवले जाते. यामुळे मेडिकलमधील हा विभाग सर्वात व्यस्त आहे. अनेक वेळा या विभागात गंभीर रुग्णांनाही खाट मिळत नाही.माळी आजारी आहेत ?सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना रविवारी अडीच लाख रु पयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली. सोमवारी त्याला पोलीस कोठडी मिळाली. रात्री ११.३० वाजता छातीत दुखते आणि घबराहट होते म्हणून त्याला याच विभागात आणले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रात्रीच एका हृदयतज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला तपासले. ईसीजी काढला. परंतु त्यात हृदयाशी संबंधित बदल दिसले नाही. तसा अहवालही दिला. सामान्यत: त्याचवेळी लगेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या संबंधित डॉक्टरने त्याला पोलिसांच्या हवाली किंवा सामान्य वॉर्डात हलवायला हवे होते. परंतु त्याला वातानुकूलित असलेल्या अतिदक्षता विभागातच ठवले. आज सकाळपासून माळी आपल्या मोबाईलमध्ये गाणी ऐकत होते, गेम खेळत होते, मोबाईलवरून दुसऱ्याशी संवाद साधत होता. याची कोणीच दखलही घेतली नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे त्याला ना सलाईन लावलेले होते ना इतर कुठले औषध. तरीही आज सकाळपासून त्याला काय पाहिजे-नको त्याची गंभीरपणे खबरबात घेणे सुरू होते. मात्र त्याचवेळी भरती असलेल्या इतर रुग्णांकडे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येत होते. त्या सामान्य रुग्णांना विविध मशीन लावून आपली जबाबदारी संपली असे वागताना काही डॉक्टर दिसून येत होते. त्यांची शुश्रुषा करण्यासाठी त्यांचे नातेवाईकच धावपळ करीत होते. ही माणुसकीची शोकांतिका आहे, असे येथील रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)