शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

लाचखोर माळींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’!

By admin | Updated: June 11, 2014 01:41 IST

मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक

सुमेध वाघमारे - नागपूर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. मात्र त्याचवेळी धडधाकट असलेल्या आरोपींना वातानुकूलित अतिदक्षता विभागात ठेवून अगदी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जाते. हा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला. लाच घेताना अटक केलेल्या अरुण माळी यांच्यावर विशेष उपचार सोमवारच्या रात्रीपासून सुरू आहे. औषध वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचा अंतर्गत वॉर्ड क्र. २४ हा अतिदक्षता विभाग येतो. २४ खाटांच्या या विभागात सुमारे १८ रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते तर विशेष सहा रुग्णांना वातानुकूलित विभागात ठेवले जाते. अतिदक्षता विभागात सर्जरी व इतरही विभागाच्या गंभीर रुग्णांनाही ठेवले जाते. यामुळे मेडिकलमधील हा विभाग सर्वात व्यस्त आहे. अनेक वेळा या विभागात गंभीर रुग्णांनाही खाट मिळत नाही.माळी आजारी आहेत ?सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना रविवारी अडीच लाख रु पयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली. सोमवारी त्याला पोलीस कोठडी मिळाली. रात्री ११.३० वाजता छातीत दुखते आणि घबराहट होते म्हणून त्याला याच विभागात आणले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रात्रीच एका हृदयतज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला तपासले. ईसीजी काढला. परंतु त्यात हृदयाशी संबंधित बदल दिसले नाही. तसा अहवालही दिला. सामान्यत: त्याचवेळी लगेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या संबंधित डॉक्टरने त्याला पोलिसांच्या हवाली किंवा सामान्य वॉर्डात हलवायला हवे होते. परंतु त्याला वातानुकूलित असलेल्या अतिदक्षता विभागातच ठवले. आज सकाळपासून माळी आपल्या मोबाईलमध्ये गाणी ऐकत होते, गेम खेळत होते, मोबाईलवरून दुसऱ्याशी संवाद साधत होता. याची कोणीच दखलही घेतली नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे त्याला ना सलाईन लावलेले होते ना इतर कुठले औषध. तरीही आज सकाळपासून त्याला काय पाहिजे-नको त्याची गंभीरपणे खबरबात घेणे सुरू होते. मात्र त्याचवेळी भरती असलेल्या इतर रुग्णांकडे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येत होते. त्या सामान्य रुग्णांना विविध मशीन लावून आपली जबाबदारी संपली असे वागताना काही डॉक्टर दिसून येत होते. त्यांची शुश्रुषा करण्यासाठी त्यांचे नातेवाईकच धावपळ करीत होते. ही माणुसकीची शोकांतिका आहे, असे येथील रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)