शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी भक्तांना दागिन्यांचा प्रसाद!

By admin | Updated: August 10, 2015 00:54 IST

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवस्थानने सत्काराच्या नावाखाली अनेक व्हीआयपींबरोबरच त्यांचे वाहनचालक, गणमान्य व्यक्ती

विशाल सोनटक्के, उस्मानाबाद साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवस्थानने सत्काराच्या नावाखाली अनेक व्हीआयपींबरोबरच त्यांचे वाहनचालक, गणमान्य व्यक्ती, अधिकाऱ्यांसह त्यांच्या पाहुण्यांना दागिने भेट देत कोट्यवधींची उधळण केल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या २० वर्षांत व्हीआयपी भक्तांना सोने, चांदी आणि महावस्त्राचा कोट्यवधी रूपयांचा प्रसाद वाटण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. तुळजापुरात भवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्यात व्हीआयपी आणि सामान्य, असे दोन प्रकारचे भक्त असतात. देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी अर्पण करतात. त्यातूनच मंदिर संस्थान व्हीआयपी भाविकांच्या झोळीत सोन्याची मूर्ती, चांदीची तलवार, मूर्ती, रथ, महावस्त्र, बनारसी फेटा, महागड्या पैठणी साड्या व शालू अशी भेटवस्तू देतात. जगदंबेचा आशीर्वाद म्हणून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या व्हीआयपींमध्ये राज्य व केंद्र सरकारमधील आजी-माजी मंत्र्यांचा समावेश आहे. सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच आसाराम बापूपासून योगगुरू रामदेव बाबाही त्यात आहेत. मंदिर संस्थानचे विश्वस्त असलेले स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनीही मोठ्या आनंदाने वेळोवेळी महागडा प्रसाद स्वीकारला आहे.

सासू-सारे आणि मेव्हणेही...राजकीय भाविकांपाठोपाठ व्हीआयपींच्या यादीत अग्रक्रमाने उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचेही स्थान आहे. गेल्या २० वर्षात काही जिल्हाधिकाऱ्यांचे सासू-सासरे, काही पोलीस अधीक्षकांचे मामा-मामी, तहसीलदारांचे साडू-मेव्हुणी, आयुक्तांचा मुलगा, जावई, गाडीचा चालक आणि त्यांचे मित्र यांच्यावरही प्रसादाची उधळण झाली.

दुष्काळी पथकही लाभार्थीगेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची स्थिती असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारचे पाहणी पथक येते. २० वर्षांतअनेक वेळा पथकातील सदस्यांनीही व्हीआयपी सत्कार स्वीकारलाआहे. निवडणूक निरीक्षक लाभार्थी ठरले आहेत.नियमावली करू- जिल्हाधिकारी

श्री तुळजाभवानी माता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. नेत्यांसह मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी देवस्थानला पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करतात. त्याचा सर्वच भाविकांना फायदा होतो. त्यामुळे व्हीआयपींचे मंदिर संस्थांनकडून यथोचित स्वागत झाले पाहिजे, अशी भूमिका असते. मात्र पुढील काळात व्हीआयपी सत्कारासाठीची नियमावली करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.