पंढरपूर : भाविकांचा ओघ वाढत असल्याने आषाढी एकादशीपर्यंत विठ्ठल-रुक्मिणीमातेची दर्शन घेण्याची व्हीआयपींसाठीची व्यवस्था बंद करण्यात आली आहे. रविवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले. शनिवारपासून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.दर्शन मंडपाचे आठ गाळे भरून संत रोहिदास चौकापर्यंत दर्शन रांग जात आहे. दररोज ६० हजार भाविक दर्शन घेत आहेत. साडेतीन हजार भाविक आॅनलाइनद्वारे दर्शन घेत आहेत. दर्शनरांगेत व्हीआयपींना सोडल्यानंतर भाविकांकडून त्यास विरोध होतो. गाभाऱ्यातही व्हीआयपींना अधिक वेळ उभे राहण्यास मुभा असते. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते.
पंढरीत आषाढीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
By admin | Updated: June 27, 2016 05:13 IST